शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

13 हजार विहिरींचे पुनर्भरण

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

र्शावण क्षीरसागर : सांगोला तालुक्यातून 59 गावांचा समावेश

र्शावण क्षीरसागर : सांगोला तालुक्यातून 59 गावांचा समावेश
सांगोला : जलशिवार अभियानांतर्गत सांगोला तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकसहभागातून वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे व विहिरीतून गाळ काढण्याची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून घ्यावीत. तालुक्यात 59 गावांमधून एकाचवेळी 13 हजार विहिरींच्या पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, गावोगावच्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलशिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी केले आहे.
राज्यामध्ये महत्त्वाकांक्षी जलशिवार अभियान सुरु असून, गावोगावच्या विकासकामांचा आराखडा आखण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यात ‘क’ तीनची कामे लोकसहभागातून करावयाची असल्याने प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी गुरुवारी शासकीय विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक पंचायत समिती बचत भवनात घेतली.
यावेळी तहसीलदार र्शीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता महारुद्र अंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पुरुषोत्तम अंधारे, सा.बां.विभागाचे उपअभियंता थोंटे, लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी विनायक खरात, नीरा उजवा कालवा उपविभागीय अधिकारी शेंडे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
तालुक्यात जलशिवार अभियानातून गावोगावी विकास कामाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. तयार झालेले आराखडे जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, मंजूर कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून घ्यावयाची आहेत. तालुक्यात ‘क’ वर्गातील कामे लोकसहभागातून करावयाची असल्याने अधिकार्‍यांची जबाबदारी वाढणार आहे. तालुक्यातील 93 साखळी बंधार्‍यातील गाळ काढणे, 193 मातीनाला बंधारे बांधणे, 6 विहीर खोलीकरण, 5 हजार 72 विहीर पुनर्भरणाची कामे लोकसहभागातून करावयाची आहेत. जलशिवार अभियानातून निवडलेली कामे पारदर्शकपणे होण्याच्या अनुषंगाने चार गावांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या बंधार्‍यातील गाळ काढण्याची कामे शुक्रवारपासून सुरु करावीत. त्यादृष्टीने ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकार्‍यांनी गावनिहाय बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे. लोकसहभागाच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशा सूचना प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
जलशिवार अभियान यशस्वी राबविण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपापले कर्तव्य चोख बजावावे. ज्याठिकाणी अडीअडचणी उभ्या राहतील अशावेळी प्रशासन तुमच्या पाठीशी राहील. वेळप्रसंगी कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन जरुर घ्यावे. जलशिवार अभियानाचा लाभ गावागावांना मिळणार असून लोकसहभाग वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार र्शीकांत पाटील यांनी केले.
निवड झालेली गावे
कोळा, तिप्पेहळ्ळी, पाचेगाव खुर्द, बुद्धेहाळ, गौडवाडी, ह.मंगेवाडी, राजुरी, झापाचीवाडी, काळूबाळूवाडी, पाचेगाव बु॥, जुनोनी, वाटंबरे, चोपडी, नाझरा, सरगरवाडी, चिणके, बलवडी, य.मंगेवाडी, लोणविरे, हणमंतगाव, सोनंद, जवळा, भोपसेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, घेरडी, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे,पारे, हंगिरगे, डिकसळ, नराळे, कडलास, अकोला, कमलापूर, एखतपूर, चिंचोली, धायटी, सावे, शिवणे, वाकी शिवणे, बागलवाडी, सोनलवाडी, अचकदाणी, लोटेवाडी, खवासपूर, कटफळ या गावांची जलशिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.
कोट ::::::::::::::::
जलशिवार अभियानातून ‘क’ एकची सुमारे 14 कोटी 85 लाख रुपये खचरून 188 कामे सुरु आहेत. तर ‘क’ दोनमध्ये पावसाळ्यात शिवारात पडलेले पाणी शिवारात अडविण्यासाठी 2 हजार 53 कामांचा 45 कोटींचा आराखडा जिल्हा समितीकडे सादर केला आहे. ‘क’ तीनमध्ये तालुक्यात जलस्रोताच्या माध्यमातून झालेल्या 5 हजार 795 कामांच्या दुरुस्ती देखभालीसाठी 29 कोटी रुपयांची कामे लोकसहभागातून पूर्ण करावयाची आहेत.
- र्शीकांत पाटील
तहसीलदार, सांगोला