शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : '...तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना करू शकतो संक्रमित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 18:36 IST

देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग2,500 डब्ब्यांमध्ये तयार करण्यात आले आहेत 40 हजार आयसोलेशन बेडदेशात आतापर्यंत 1,07,006 जणांची करण्यात आली कोरोना टेस्ट

नवी दिल्‍ली : लॉकडाऊन अथवा सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही, तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना कोरोना बाधित करतो, असे आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आले आहे. मात्र,  आपण लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केले तर एक व्यक्ती केवळ 2.5 लोकांनाच संक्रमित करू शकतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच अद्याप लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे  कसल्याही प्रकारचे अंदाज बांधू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

2,500 डब्ब्यांमध्ये 40 हजार आयसोलेशन बेड - 

अग्रवाल म्हमणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 2,500 डब्ब्यांमध्ये तब्बल 40,000 आयसोलेशन बेड तयार केले आहेत. ते रोज 375 आयसोलेशन बेड तयार करत आहेत. देशातील 133 ठिकाणी हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार समूह नियंत्रण आणि प्रशासनास उत्तरदाई आहे.  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका विशेष रणनीतीवर काम करत आहे. ही रणनीती मुख्यतः आगरा, गौतम बुद्ध नगर, पथानमथिट्टा, भीलवाडा आणि पूर्व दिल्लीमध्ये सकारात्मक सिद्ध होत आहे.

देशात आतापर्यंत 1,07,006 टेस्‍ट -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्‍ट करण्यात आल्या आहेत. सध्या 136 सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. तसेच 59 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्यात आली आहे.

देशातील आवश्यक वस्तू आणि सेवा समाधान कारक -यावेळी बोलताना गृह मंत्रालयाच्या संयुक्‍त सचिव पुण्‍य सलिला श्रीवास्‍तव म्हणाल्या, आवश्यक वस्तू आणि  सेवा समाधानकारक आहेत. गृह मंत्रालयाने आवश्यक वस्तूंची आणि लॉकडाऊनमधील उपायांसंदर्भात सविस्तर समीक्षा केली आहे. तसेच साठेबाजी आणि काजाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत