शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Coronavirus : '...तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना करू शकतो संक्रमित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 18:36 IST

देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग2,500 डब्ब्यांमध्ये तयार करण्यात आले आहेत 40 हजार आयसोलेशन बेडदेशात आतापर्यंत 1,07,006 जणांची करण्यात आली कोरोना टेस्ट

नवी दिल्‍ली : लॉकडाऊन अथवा सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही, तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना कोरोना बाधित करतो, असे आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आले आहे. मात्र,  आपण लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केले तर एक व्यक्ती केवळ 2.5 लोकांनाच संक्रमित करू शकतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच अद्याप लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे  कसल्याही प्रकारचे अंदाज बांधू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

2,500 डब्ब्यांमध्ये 40 हजार आयसोलेशन बेड - 

अग्रवाल म्हमणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 2,500 डब्ब्यांमध्ये तब्बल 40,000 आयसोलेशन बेड तयार केले आहेत. ते रोज 375 आयसोलेशन बेड तयार करत आहेत. देशातील 133 ठिकाणी हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार समूह नियंत्रण आणि प्रशासनास उत्तरदाई आहे.  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका विशेष रणनीतीवर काम करत आहे. ही रणनीती मुख्यतः आगरा, गौतम बुद्ध नगर, पथानमथिट्टा, भीलवाडा आणि पूर्व दिल्लीमध्ये सकारात्मक सिद्ध होत आहे.

देशात आतापर्यंत 1,07,006 टेस्‍ट -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्‍ट करण्यात आल्या आहेत. सध्या 136 सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. तसेच 59 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्यात आली आहे.

देशातील आवश्यक वस्तू आणि सेवा समाधान कारक -यावेळी बोलताना गृह मंत्रालयाच्या संयुक्‍त सचिव पुण्‍य सलिला श्रीवास्‍तव म्हणाल्या, आवश्यक वस्तू आणि  सेवा समाधानकारक आहेत. गृह मंत्रालयाने आवश्यक वस्तूंची आणि लॉकडाऊनमधील उपायांसंदर्भात सविस्तर समीक्षा केली आहे. तसेच साठेबाजी आणि काजाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत