शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

सासूच्या मदतीने सुनेला मिळाली 4 कोटींची पोटगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 10:22 IST

मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे.

ठळक मुद्देमुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे.घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत

बंगळुरू, दि. 8- मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे. घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा काशप्पनावर यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. देवानंद शिवशंकरप्पा कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री एस.एस. काशप्पनावर यांचा मुलगा आहे.

कौटुंबिक न्यायालयाने 24 जुलै रोजी हा निर्णय दिला. या प्रकरणातील  विशेष बाब म्हणजे कोर्टात देवानंद यांच्या आईने सुनेच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणातील सुनेने 2015मध्ये  पतीपासून वेगळं होण्यासाठी आणि 4.85 कोटी रूपये पोटगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या मागणीला कोर्टाने मंजुरी दिली आहे. हे दोघं पती-पत्नी 2012 पासून वेगळे राहत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. या दरम्यान ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत. तसंच या काळात त्या महिलेने तिच्या पतीकडे परत जाण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार जर घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानतंर दोन वर्ष जर पती-पत्नी एकत्र राहिले नाहीत याचिकाकर्ती व्यक्ती घटस्फोटासाठी पात्र असते. याप्रकरणी कोर्टाने देवानंद यांच्या आईचीही साक्ष नोंदवू घेतली. त्यांनी कोर्टात सांगितलं, जेव्हा त्यांच्या मुलाने याचिकाकर्त्या महिलेशी लग्न केलं होतं त्याच्या आधीही त्यांचं एक लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे. देवानंद यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन दुसरं लग्न केलं आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता दुसऱ्या पत्नीला सोडून दिलं. देवानंद यांच्याकडे बऱ्याच जमीनी, आलिशान गाड्या आणि भरपूर पैसे असल्याचं, देवानंद यांच्या आईने कोर्टात सांगितलं. कोर्टाने नोटीस पाठवूनही देवानंद सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले नव्हते. याचिकाकर्त्या जेव्हा बीबीएचं शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं होतं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर काही आठवड्यातच देवानंद यांच्या वागण्यात बदल झाला. एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे ते वागणुक द्यायला लागले. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत असल्याचं, या महिलेने सांगितलं आहे.