शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सासूच्या मदतीने सुनेला मिळाली 4 कोटींची पोटगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 10:22 IST

मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे.

ठळक मुद्देमुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे.घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत

बंगळुरू, दि. 8- मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे. घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा काशप्पनावर यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. देवानंद शिवशंकरप्पा कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री एस.एस. काशप्पनावर यांचा मुलगा आहे.

कौटुंबिक न्यायालयाने 24 जुलै रोजी हा निर्णय दिला. या प्रकरणातील  विशेष बाब म्हणजे कोर्टात देवानंद यांच्या आईने सुनेच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणातील सुनेने 2015मध्ये  पतीपासून वेगळं होण्यासाठी आणि 4.85 कोटी रूपये पोटगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या मागणीला कोर्टाने मंजुरी दिली आहे. हे दोघं पती-पत्नी 2012 पासून वेगळे राहत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. या दरम्यान ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत. तसंच या काळात त्या महिलेने तिच्या पतीकडे परत जाण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार जर घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानतंर दोन वर्ष जर पती-पत्नी एकत्र राहिले नाहीत याचिकाकर्ती व्यक्ती घटस्फोटासाठी पात्र असते. याप्रकरणी कोर्टाने देवानंद यांच्या आईचीही साक्ष नोंदवू घेतली. त्यांनी कोर्टात सांगितलं, जेव्हा त्यांच्या मुलाने याचिकाकर्त्या महिलेशी लग्न केलं होतं त्याच्या आधीही त्यांचं एक लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे. देवानंद यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन दुसरं लग्न केलं आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता दुसऱ्या पत्नीला सोडून दिलं. देवानंद यांच्याकडे बऱ्याच जमीनी, आलिशान गाड्या आणि भरपूर पैसे असल्याचं, देवानंद यांच्या आईने कोर्टात सांगितलं. कोर्टाने नोटीस पाठवूनही देवानंद सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले नव्हते. याचिकाकर्त्या जेव्हा बीबीएचं शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं होतं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर काही आठवड्यातच देवानंद यांच्या वागण्यात बदल झाला. एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे ते वागणुक द्यायला लागले. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत असल्याचं, या महिलेने सांगितलं आहे.