शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सासूच्या मदतीने सुनेला मिळाली 4 कोटींची पोटगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 10:22 IST

मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे.

ठळक मुद्देमुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे.घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत

बंगळुरू, दि. 8- मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे. घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा काशप्पनावर यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. देवानंद शिवशंकरप्पा कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री एस.एस. काशप्पनावर यांचा मुलगा आहे.

कौटुंबिक न्यायालयाने 24 जुलै रोजी हा निर्णय दिला. या प्रकरणातील  विशेष बाब म्हणजे कोर्टात देवानंद यांच्या आईने सुनेच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणातील सुनेने 2015मध्ये  पतीपासून वेगळं होण्यासाठी आणि 4.85 कोटी रूपये पोटगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या मागणीला कोर्टाने मंजुरी दिली आहे. हे दोघं पती-पत्नी 2012 पासून वेगळे राहत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. या दरम्यान ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत. तसंच या काळात त्या महिलेने तिच्या पतीकडे परत जाण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार जर घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानतंर दोन वर्ष जर पती-पत्नी एकत्र राहिले नाहीत याचिकाकर्ती व्यक्ती घटस्फोटासाठी पात्र असते. याप्रकरणी कोर्टाने देवानंद यांच्या आईचीही साक्ष नोंदवू घेतली. त्यांनी कोर्टात सांगितलं, जेव्हा त्यांच्या मुलाने याचिकाकर्त्या महिलेशी लग्न केलं होतं त्याच्या आधीही त्यांचं एक लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे. देवानंद यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन दुसरं लग्न केलं आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता दुसऱ्या पत्नीला सोडून दिलं. देवानंद यांच्याकडे बऱ्याच जमीनी, आलिशान गाड्या आणि भरपूर पैसे असल्याचं, देवानंद यांच्या आईने कोर्टात सांगितलं. कोर्टाने नोटीस पाठवूनही देवानंद सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले नव्हते. याचिकाकर्त्या जेव्हा बीबीएचं शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं होतं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर काही आठवड्यातच देवानंद यांच्या वागण्यात बदल झाला. एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे ते वागणुक द्यायला लागले. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत असल्याचं, या महिलेने सांगितलं आहे.