शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

नासधूस करणाऱ्यांकडून भरपाई वसूल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:29 IST

दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज; तातडीने सुनावणीस नकार

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांकडून त्याची भरपाई वसूल करण्याचा अधिकाºयांना आदेश द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज दिल्लीउच्च न्यायालयात करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका सादर केली. या विषयाची न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी किंवा तसा अर्ज करण्याची मला परवानगी द्यावी, अशी विनंती उपाध्याय यांनी केली आहे.

याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. उपाध्याय यांनी स्वतंत्रपणे अर्ज केल्यास त्याचीही सुनावणी काही काळाने घेण्यात येईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पेशाने वकील असलेल्या अश्विनीकुमार उपाध्याय यांनी न्यायालयाला सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांदरम्यान हजारो कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक उपक्रमांच्या बसगाड्या तसेच इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेशमध्येही असे प्रकार घडले आहेत. या प्रकारांस जबाबदार असलेल्यांकडून भरपाई वसूल करण्यात यावी.मंगळुरूत आंदोलकांनी रिक्षातून आणले दगड; चेहरे होते झाकलेलेच्बंगळुरू : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात मंगळुरूत १९ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात निदर्शकांनी आॅटो-ट्रॉलीतून दगड आणले व ते सुरक्षा कर्मचाºयांना मारले व निदर्शकांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात दोन जणांचा मृत्यू झाला. आंदोलकांनी आॅटो-ट्रॉलीतून दगड आणले, ते फेकले व सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज पोलिसांनी सोमवारी रात्री जारी केल्या.च्या फुटेजमध्ये निदर्शकांनी स्वत:ची ओळख न पटण्यासाठी चेहरे कपड्यांनी झाकून घेतले, तसेच त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. जनता दल (एस) आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी या आंदोलनात गोळीबारात मरण पावलेले लोक हे ‘निष्पाप’ होते व त्यांचा हिंसाचाराशी काहीही संबंध नव्हता, असा दावा केल्यानंतर पोलिसांनी हे फुटेज लोकांसमोर आणले.च्माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी यांनी मरण पावलेल्या दोन जणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. राज्य सरकारने या दोन मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपये आधीच दिले आहेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय