शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नासधूस करणाऱ्यांकडून भरपाई वसूल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:29 IST

दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज; तातडीने सुनावणीस नकार

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांकडून त्याची भरपाई वसूल करण्याचा अधिकाºयांना आदेश द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज दिल्लीउच्च न्यायालयात करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका सादर केली. या विषयाची न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी किंवा तसा अर्ज करण्याची मला परवानगी द्यावी, अशी विनंती उपाध्याय यांनी केली आहे.

याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. उपाध्याय यांनी स्वतंत्रपणे अर्ज केल्यास त्याचीही सुनावणी काही काळाने घेण्यात येईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पेशाने वकील असलेल्या अश्विनीकुमार उपाध्याय यांनी न्यायालयाला सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांदरम्यान हजारो कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक उपक्रमांच्या बसगाड्या तसेच इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेशमध्येही असे प्रकार घडले आहेत. या प्रकारांस जबाबदार असलेल्यांकडून भरपाई वसूल करण्यात यावी.मंगळुरूत आंदोलकांनी रिक्षातून आणले दगड; चेहरे होते झाकलेलेच्बंगळुरू : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात मंगळुरूत १९ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात निदर्शकांनी आॅटो-ट्रॉलीतून दगड आणले व ते सुरक्षा कर्मचाºयांना मारले व निदर्शकांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात दोन जणांचा मृत्यू झाला. आंदोलकांनी आॅटो-ट्रॉलीतून दगड आणले, ते फेकले व सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज पोलिसांनी सोमवारी रात्री जारी केल्या.च्या फुटेजमध्ये निदर्शकांनी स्वत:ची ओळख न पटण्यासाठी चेहरे कपड्यांनी झाकून घेतले, तसेच त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. जनता दल (एस) आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी या आंदोलनात गोळीबारात मरण पावलेले लोक हे ‘निष्पाप’ होते व त्यांचा हिंसाचाराशी काहीही संबंध नव्हता, असा दावा केल्यानंतर पोलिसांनी हे फुटेज लोकांसमोर आणले.च्माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी यांनी मरण पावलेल्या दोन जणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. राज्य सरकारने या दोन मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपये आधीच दिले आहेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय