शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नासधूस करणाऱ्यांकडून भरपाई वसूल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:29 IST

दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज; तातडीने सुनावणीस नकार

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांकडून त्याची भरपाई वसूल करण्याचा अधिकाºयांना आदेश द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज दिल्लीउच्च न्यायालयात करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका सादर केली. या विषयाची न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी किंवा तसा अर्ज करण्याची मला परवानगी द्यावी, अशी विनंती उपाध्याय यांनी केली आहे.

याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. उपाध्याय यांनी स्वतंत्रपणे अर्ज केल्यास त्याचीही सुनावणी काही काळाने घेण्यात येईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पेशाने वकील असलेल्या अश्विनीकुमार उपाध्याय यांनी न्यायालयाला सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांदरम्यान हजारो कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक उपक्रमांच्या बसगाड्या तसेच इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेशमध्येही असे प्रकार घडले आहेत. या प्रकारांस जबाबदार असलेल्यांकडून भरपाई वसूल करण्यात यावी.मंगळुरूत आंदोलकांनी रिक्षातून आणले दगड; चेहरे होते झाकलेलेच्बंगळुरू : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात मंगळुरूत १९ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात निदर्शकांनी आॅटो-ट्रॉलीतून दगड आणले व ते सुरक्षा कर्मचाºयांना मारले व निदर्शकांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात दोन जणांचा मृत्यू झाला. आंदोलकांनी आॅटो-ट्रॉलीतून दगड आणले, ते फेकले व सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज पोलिसांनी सोमवारी रात्री जारी केल्या.च्या फुटेजमध्ये निदर्शकांनी स्वत:ची ओळख न पटण्यासाठी चेहरे कपड्यांनी झाकून घेतले, तसेच त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. जनता दल (एस) आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी या आंदोलनात गोळीबारात मरण पावलेले लोक हे ‘निष्पाप’ होते व त्यांचा हिंसाचाराशी काहीही संबंध नव्हता, असा दावा केल्यानंतर पोलिसांनी हे फुटेज लोकांसमोर आणले.च्माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी यांनी मरण पावलेल्या दोन जणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. राज्य सरकारने या दोन मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपये आधीच दिले आहेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय