शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

CoronaVirus News: २७ दिवस पायी चालत गाठले बिहारमधील गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:50 IST

हरिवंश चौधरी या मजुराने भार्इंदर येथून बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील पंचोभ या आपल्या गावी पायी चालत जाण्याचे ठरविले. ते दरमजल करत अखेर २७ दिवसांनी गावी पोहोचले.

दरभंगा : कोरोना साथीमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात २१ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केल्यानंतर अडकून पडलेल्या काही लाख मजुरांपैकी एक असलेल्या हरिवंश चौधरी या मजुराने भार्इंदर येथून बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील पंचोभ या आपल्या गावी पायी चालत जाण्याचे ठरविले.ते दरमजल करत अखेर २७ दिवसांनी गावी पोहोचले.हरिवंश हे भार्इंदर येथे एका स्टील फॅक्टरीत काम करतात. लॉकडाऊनमुळे फॅक्टरी मालकाने त्यांना सुट्टीवर जाण्यास सांगितले. फॅक्टरी बंद असल्यामुळे हातात रोजगारही नव्हता. रेल्वे तसेच सार्वजजिक , खासगी वाहतूक सेवाही सरकारने स्थगित केल्यामुळे गावाकडे जाण्याचा मार्गही बंद झाला होता. तुटपुंजे पैसे हाती असलेल्या हरिवंश यांनी अखेर बिहारमधील आपल्या गावी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. भाईंदर ते बिहारमधील गाव यामधील अंतर सुमारे १८०० किमीचे होते. भाईंदरहून निघाले असताना हरिवंश चौधरी यांना वाटेत उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने पायी चालत जाणारा २५ जणांचा एक गट भेटला. हे लोक रोज सकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालत.रात्री एखाद्या आडोशाला किंवा झाडाखाली झोपत. रेल्वेरुळांतून, रस्त्याने ते चालत आपापल्या गावाच्या दिशेने चालत होते.हरिवंश चौधरी यांनी सांगितले की, या प्रवासात आमच्याकडे दोन वेळचे पुरेसे जेवण कधीच नसायचे. कधी मिळाली तर बिस्किटे, पाव किंवा कधी असेच काहीतरी खाऊन आम्ही भूक भागवायचो. खिशात खूपच कमी पैसे होते. वाटेत काही वेळेस दयाळू लोकांनी आम्हाला जेवणही दिले. काही ट्रकचालकांनी थोडक्या अंतरापर्यंत का होईना आम्हाला पुढे नेऊन सोडले. अशी दरमजल करत अखेर २७ दिवसांनी मी माझ्या गावी पोहोचलो.१ ४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये रवानगीहरिवंश चौधरी म्हणाले की, आमची प्रकृती तपासून मुंबई पोलिसांनी आम्हाला एक हेल्थ स्लिप दिली होती. ती विविध राज्यांत जिथे पोलिसांनी हटकले त्यांना दाखवत होते. त्या स्लिपमुळे पोलिसांनी आम्हाला रोखून घरले नाही. दरभंगा जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचताच हरिवंश यांना १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात आले. मात्र इतक्या पायपीटीनंतर आपले वडील व कुटुंबीयांना भेटता आल्याचा आनंद हरिवंश चौधरी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या