शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

देशाच्या कानाकोपऱ्यात उपाध्याय यांना पोहोचविणार

By admin | Updated: August 22, 2016 04:29 IST

जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार केंद्रातील भाजप सरकारने केला आहे.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली- जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. यासाठी एक खास योजना आखण्यात आली असून, देशातील ६८३ जागांवर दीनदयाल उपाध्याय यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. सामाजिक सभागृह आणि ग्रंथालयेही उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचे समजते. काँग्रेसकडून फक्त नेहरू आणि गांधी कुटुंबाचे कौतुक होते, असा आरोप भाजपकडून नेहमीच होतो.मोदींच्या हस्ते प्रारंभ होणाऱ्या या योजनेसाठी केरळातील कालिकट हे ठिकाण निवडण्यात आले आहे. येथेच उपाध्याय यांना १९६७ मध्ये जनसंघाचे अध्यक्ष निवडण्यात आले. दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची घोषणा सरकारने यापूर्वीच केली आहे, तर केंद्रीय बजेटमध्ये यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून ८० टक्के स्मारक, सामाजिक सभागृह आणि ग्रंथालय उभारण्यात येतील. यासाठी राज्य सरकारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. >कालिकटमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी?भाजपने आपल्या आगामी कार्यकारिणी बैठकीसाठी कालिकट हे ठिकाण निवडले आहे. २३ ते २५ सप्टेंबर या काळात होणाऱ्या बैठकीस २,५०० हून अधिक कार्यकर्ते हजर राहतील, असा अंदाज आहे. यावेळी मोदींच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणासाठी देशात ४,००० विधानसभा क्षेत्रात मोठे स्क्रीन लावण्याची योजना आहे.भाजपचे आरोप : भाजपने अनेकदा काँग्रेसवर आरोप केलेले आहेत की, नेहरू आणि गांधी कुटुंबांशिवाय अन्य दुसऱ्या नेत्यांची ओळख मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, शिवाजी, मौलाना आझाद, भगतसिंह, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, विवेकानंद आणि महाराणा प्रताप यांचे डाक तिकीट जारी करण्याचा निर्णय घेताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते की, फक्त एकाच कुटुंबाला हा सन्मान मिळू शकत नाही.