शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

RBI Vs Government: रिझर्व्ह बँकेच्या उच्चपदस्थांची घुसमट चव्हाट्यावर का आली? जाणून घ्या आतली बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:14 IST

गुरूमूर्तींचा अनावश्यक हस्तक्षेप; बोर्डावरील नियुक्तीमुळे अधिकारी नाराज

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : रिझर्व बँक व मोदी सरकार यांच्यातील कडवटपणा अखेर चव्हाट्यावर आला. हे सारे को घडले? तणाव कोणत्या कारणांमुळे निर्माण झाला, हे शोधताना वेगळाच घटनाक्रम समोर आला आहे. बँकेच्या कारभारात सरकारने चालविलेल्या हस्तक्षेपामुळे संतापलेले डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी गेल्या शुक्रवारी केलेल्या भाषणातून घुसमट प्रथमच बाहेर आली. आचार्य म्हणाले की, जी सरकारे केंद्रीय बँकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करीत नाहीत, तिथला आर्थिक बाजार तत्काळ गंभीर संकटात सापडतो. अर्थव्यवस्था पेट घेते व देशातल्या प्रमुख संस्थांची भूमिकाच असहाय अन् पोकळ होऊन जाते.आचार्य यांच्या या भाषणामुळे केंद्र सरकार अस्वस्थ झाले. सरकारची अस्वस्थता अर्थमंत्री अरुण जेटलींकडून व्यक्त झाली. ‘यूपीए सरकार सत्तेवर असताना २00९ ते २0१४ दरम्यान राष्ट्रीकृत बँकांनी अंदाधुंद कर्जे वाटली. त्यावर रिझर्व बँक नियंत्रण ठेवू शकली नाही, हा जेटलींच्या त्यानंतर आलेल्या निवेदनाचा सारांश होता. या वादाचा सुगावा लागताच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला आग्रह केला की, हा संघर्ष लवकरात लवकर संपवा. रिझर्व्ह बँक व सरकार दोघांनी समोरासमोर बसून, चर्चेतून मार्ग काढला पाहिजे.नोटाबंदीचा निर्णय, मुद्रा बँक संकल्पना यांच्याच सल्ल्याने बँकेच्या बोर्डावर रा.स्व. संघाच्या स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक गुरुमूर्तींची नियुक्ती बँकेच्या उच्चपदस्थांना अजिबात रुचलेली नाही. तथापि, या नियुक्तीला जाहीरपणे विरोध झाला नाही. नोव्हेंबर २0१६ मध्ये नोटाबंदीचा जो वादग्रस्त निर्णय मोदी सरकारने घेतला, त्यामागे गुरुमूर्तीची भूमिका कारणीभूत होती.मुद्रा बँकेची संकल्पनाही गुरुमूर्तींच्याच सल्ल्यानुसारच पंतप्रधानांनी सुरू केल्याचे मानले जाते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विरोधात गुरुमूर्ती कडवट टीका करीत आले आहेत. भारतासाठी विचार करणे बँकेने सोडून दिले आहे, असे गुरुमूर्ती मध्यंतरी म्हणाले होते.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार