शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोरोना संकटात मोठा दिलासा! मोदी सरकारला मिळणार तब्बल ९९,१२२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:07 IST

देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असताना आर्थिक आघाडीवर सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. मार्च, एप्रिल महिन्यात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लादले. यामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल कमी झाला. देश कोरोना संकटात असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) केंद्र सरकारला ९९ हजार १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुकजुलै २०२० ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मिळालेली सरप्लस रक्कम आरबीआय केंद्राला देणार आहे. आरबीआयच्या बोर्डाची ५८९ वी बैठक आज पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. 'आरबीआयनं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च केलं आहे. आधी आर्थिक वर्ष जुलै ते जून असं होतं. त्यामुळेच बोर्डानं जुलै ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावघीतील कामकाजाबद्दल चर्चा केली. बैठकीत वार्षिक अहवालाला मंजुरी देण्यात आली. केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यासही मंजुरी दिली गेली आहे,' असं आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.याआधी २०१९ मध्ये आरबीआयनं मोदी सरकारला १.७६ लाख कोटी रुपये दिले होते. त्यावेळी विरोधकांनी आरबीआयच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली होती. बिमल जालान समितीच्य शिफारसीनुसार ही रक्कम हस्तांतरित केली गेली होती. आरबीआय आपल्याकडे असणारी सरप्लस रक्कम दरवर्षी सरकारला देते. त्याला लाभांश म्हटलं जातं. आरबीआयची स्थापना १९३४ मध्ये झाली. आरबीआय कायदा १९३४ च्या अंतर्गत बँकेचं कामकाज चालतं.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्या