शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

कोरोना संकटात मोठा दिलासा! मोदी सरकारला मिळणार तब्बल ९९,१२२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:07 IST

देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असताना आर्थिक आघाडीवर सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. मार्च, एप्रिल महिन्यात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लादले. यामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल कमी झाला. देश कोरोना संकटात असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) केंद्र सरकारला ९९ हजार १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुकजुलै २०२० ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मिळालेली सरप्लस रक्कम आरबीआय केंद्राला देणार आहे. आरबीआयच्या बोर्डाची ५८९ वी बैठक आज पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. 'आरबीआयनं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च केलं आहे. आधी आर्थिक वर्ष जुलै ते जून असं होतं. त्यामुळेच बोर्डानं जुलै ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावघीतील कामकाजाबद्दल चर्चा केली. बैठकीत वार्षिक अहवालाला मंजुरी देण्यात आली. केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यासही मंजुरी दिली गेली आहे,' असं आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.याआधी २०१९ मध्ये आरबीआयनं मोदी सरकारला १.७६ लाख कोटी रुपये दिले होते. त्यावेळी विरोधकांनी आरबीआयच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली होती. बिमल जालान समितीच्य शिफारसीनुसार ही रक्कम हस्तांतरित केली गेली होती. आरबीआय आपल्याकडे असणारी सरप्लस रक्कम दरवर्षी सरकारला देते. त्याला लाभांश म्हटलं जातं. आरबीआयची स्थापना १९३४ मध्ये झाली. आरबीआय कायदा १९३४ च्या अंतर्गत बँकेचं कामकाज चालतं.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्या