शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

कोरोना संकटात मोठा दिलासा! मोदी सरकारला मिळणार तब्बल ९९,१२२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:07 IST

देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असताना आर्थिक आघाडीवर सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. मार्च, एप्रिल महिन्यात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लादले. यामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल कमी झाला. देश कोरोना संकटात असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) केंद्र सरकारला ९९ हजार १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुकजुलै २०२० ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत मिळालेली सरप्लस रक्कम आरबीआय केंद्राला देणार आहे. आरबीआयच्या बोर्डाची ५८९ वी बैठक आज पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. 'आरबीआयनं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च केलं आहे. आधी आर्थिक वर्ष जुलै ते जून असं होतं. त्यामुळेच बोर्डानं जुलै ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावघीतील कामकाजाबद्दल चर्चा केली. बैठकीत वार्षिक अहवालाला मंजुरी देण्यात आली. केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यासही मंजुरी दिली गेली आहे,' असं आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.याआधी २०१९ मध्ये आरबीआयनं मोदी सरकारला १.७६ लाख कोटी रुपये दिले होते. त्यावेळी विरोधकांनी आरबीआयच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली होती. बिमल जालान समितीच्य शिफारसीनुसार ही रक्कम हस्तांतरित केली गेली होती. आरबीआय आपल्याकडे असणारी सरप्लस रक्कम दरवर्षी सरकारला देते. त्याला लाभांश म्हटलं जातं. आरबीआयची स्थापना १९३४ मध्ये झाली. आरबीआय कायदा १९३४ च्या अंतर्गत बँकेचं कामकाज चालतं.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्या