शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेतील अल्पमतामुळे रालोआ चिंतित!

By admin | Updated: July 1, 2014 02:25 IST

येत्या 7 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना, राज्यसभेतील अल्पमतामुळे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) चिंता वाढल्या आहेत़

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
येत्या 7 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना, राज्यसभेतील अल्पमतामुळे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) चिंता वाढल्या आहेत़ 245 सदस्यांच्या राज्यसभेत रालोआचे जेमतेम 57 खासदार आहेत़ अशास्थितीत मनाप्रमाणो कामकाज उरकून घेणो रालोआ नेतृत्वाला कठीण जाऊ शकत़े
भाजपा, तेदेपा, शिवसेना, अकाली दल, आरपीआय (आ.) आणि एनपीएफ या पक्षांची मोट असलेल्या रालोआकडे राज्यसभेत सर्व मिळून 57 खासदार आहेत़ इंडियन नॅशनल लोकदलाचे दोन खासदार आणि काही अपक्ष आणि एक खासदार असलेले सुमारे डझनभर लहानसहान पक्षांच्या पाठिंब्याने हा आकडा जास्तीतजास्त 65 वर जाऊ शकतो़ पण राज्यसभेतील कामकाज सुरळीतपणो चालविण्यासाठी भाजपाला 122 खासदारांचा जादुई आकडा गाठण्याची गरज आह़े अलीकडे झालेल्या राज्यसभा निवडणुकीनेही रालोआच्या संख्याबळात काहीही भर पडलेली नाही़ राज्यसभेत पूर्ण बहुमतासाठी रालोआला आणखी किमान चार वर्षे लागतील. 2क्14 आणि 2क्15 मधील विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळाले तरच चार वर्षात राज्यसभेत बहुमत मिळवणो शक्य होईल. तूर्तास तरी राज्यसभेचे नेते असलेले केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि संसदीय कामकाज मंत्री एम़ वेंकय्या नायडू यांना सरकारी कामकाज उरकून घेण्यात अनेक अडचणींचा  सामना करावा लागणार आह़े
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तिगतरीत्या अण्णाद्रमुक प्रमुख जयललिता यांच्या संपर्कात आहेत. कायदा व दूरसंचार मंत्री रवी शंकर हेही जयललितांच्या नियमित संपर्कात असल्याचे कळत़े एरवी सार्वजनिकरीत्या मोदींविरोधी भूमिका घेणो भाग असलेल्या बसपाप्रमुख मायावती या  वरिष्ठ सभागृहात मोदी सरकारच्या मदतीला धावून जाऊ  शकतात़  तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी तसेच बीजद प्रमुख नवीन पटनायक हे दोघेही मोदींच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता मात्र दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर  राज्यसभेत आपली महत्त्वपूर्ण विधेयके मार्गी लावणो रालोआला कठीण दिसते. काँग्रेसने विधेयकांना विरोध केल्यास सरकार संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवेल, हे आधीच मोदी सरकारने सांगून टाकले आह़े पण कदािचत तशी वेळच येणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आह़े
 
4राज्यसभेत काँग्रेसचे 68 खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे दोन आणि अन्य काही मित्र पक्ष असे मिळून यूपीएचा हा आकडा 75 च्या घरात जातो़ डाव्या पक्षांचे 11, जनता दला(युनायटेड)चे 12 आणि समाजवादी पक्षाचे 1क् हे पक्ष वेळ आल्यास मोदी सरकारला विरोध या सामायिक कारणासाठी काँग्रेसच्या बाजूने उभे राहू शकतात़ पण ख:या अर्थाने बहुजन समाज पार्टी (14 खासदार), तृणमूल काँग्रेस (12 खासदार), अण्णाद्रमुक (11 खासदार), बीजू जनता दल (7 खासदार) हे पक्ष राज्यसभेत निर्णायक भूमिकेत राहणार आहेत़