शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय; सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 22:48 IST

चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक करणंदेखील रोजगार आहे असंही म्हणाल का; नेटकऱ्यांचा सवाल

मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावणारे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा फेटाळताना प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला होता. त्यावरुन सोशल मीडियानं प्रसाद यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याचे पडसाद ट्विटरवर लगेचच पाहालया मिळाले. या सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय, असं ट्विट एका वापरकर्त्यानं केलं आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं उद्या हे सरकार चित्रपटगृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार करण्यालाही रोजगार म्हणेल, असा टोला लगावला आहे. चित्रपट उत्तम कमाई करत असल्यानं अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद यांची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुलाई केली आहे. प्रसाद यांचाच तर्क वापरायचा झाला तर मग २००८ मध्ये केआरकेच्या देशद्रोही चित्रपटानं १० लाखदेखील कमावले नव्हते. मग ते वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट होतं असं म्हणायचं का, असा प्रश्न एकानं विचारला आहे.  काय म्हणाले होते रवीशंकर प्रसाद?'मला चित्रपट अतिशय आवडतात. सध्या चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. २ ऑक्टोबरला ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकारानं दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानंच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,' असं प्रसाद यांनी म्हटलं होतं.

 

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादEconomyअर्थव्यवस्थाSocial Mediaसोशल मीडिया