शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; एक चूक महागात पडणार, जाणून घ्या नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 22:30 IST

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियम लक्षात घ्या, अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली: तुम्ही रेशन कार्डचे लाभार्थी आहात, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्याकडे असलेली रेशन कार्ड धारकांची यादी वेळोवेळी अपडेट करतं. यात काही गडबड आढळून आल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येतात. तुम्ही बराच काळ रेशन कार्डचा वापर केला नसल्यास ते रद्द केलं जाऊ शकतं.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवलं जातं. नागरी पुरवठा प्रणालीच्या अंतर्गत कुटुंबात असलेल्या सदस्य संख्येच्या आधारे अतिशय स्वस्त दरांत सरकार लोकांना रेशन उपलब्ध करून दिलं जातं. गरिब कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश यामागे आहे.

तुम्ही कोणत्या महिन्यांत किती रेशन घेतलं, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती रेशन विभागाकडे उपलब्ध असते. त्या माहितीच्या आधारे विभागाकडून वेळोवेळी रेशन कार्डधारकांची यादी अपडेट केली जाते. बऱ्याच महिन्यांपासून वापरात नसलेली रेशन कार्ड रद्द केली जातात.

नियम नेमका काय?एखादा रेशन कार्ड धारक सहा महिन्यांपासून रेशन घेत नसेल, तर त्याला स्वस्त दरातील धान्याची गरज नसल्याचं सिद्ध होतं, असा नियम आहे. त्यामुळे एखादं कुटुंब सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रेशन घेत नसल्यास त्यांचं रेशन कार्ड रद्द केलं जातं. 

रेशन कार्ड रद्द झाल्यावर ते पुन्हा ऍक्टिव्ह करायचं असल्यास एक सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी तुमच्या राज्यातील AePDS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन काही तपशील भरावा लागतो. संपूर्ण भारतासाठी असलेल्या AePDS रेशन कार्ड पोर्टलवरही तुम्ही रेशन कार्ड ऍक्टिव्ह करू शकतात.