शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; एक चूक महागात पडणार, जाणून घ्या नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 22:30 IST

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियम लक्षात घ्या, अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली: तुम्ही रेशन कार्डचे लाभार्थी आहात, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्याकडे असलेली रेशन कार्ड धारकांची यादी वेळोवेळी अपडेट करतं. यात काही गडबड आढळून आल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येतात. तुम्ही बराच काळ रेशन कार्डचा वापर केला नसल्यास ते रद्द केलं जाऊ शकतं.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवलं जातं. नागरी पुरवठा प्रणालीच्या अंतर्गत कुटुंबात असलेल्या सदस्य संख्येच्या आधारे अतिशय स्वस्त दरांत सरकार लोकांना रेशन उपलब्ध करून दिलं जातं. गरिब कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश यामागे आहे.

तुम्ही कोणत्या महिन्यांत किती रेशन घेतलं, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती रेशन विभागाकडे उपलब्ध असते. त्या माहितीच्या आधारे विभागाकडून वेळोवेळी रेशन कार्डधारकांची यादी अपडेट केली जाते. बऱ्याच महिन्यांपासून वापरात नसलेली रेशन कार्ड रद्द केली जातात.

नियम नेमका काय?एखादा रेशन कार्ड धारक सहा महिन्यांपासून रेशन घेत नसेल, तर त्याला स्वस्त दरातील धान्याची गरज नसल्याचं सिद्ध होतं, असा नियम आहे. त्यामुळे एखादं कुटुंब सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रेशन घेत नसल्यास त्यांचं रेशन कार्ड रद्द केलं जातं. 

रेशन कार्ड रद्द झाल्यावर ते पुन्हा ऍक्टिव्ह करायचं असल्यास एक सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी तुमच्या राज्यातील AePDS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन काही तपशील भरावा लागतो. संपूर्ण भारतासाठी असलेल्या AePDS रेशन कार्ड पोर्टलवरही तुम्ही रेशन कार्ड ऍक्टिव्ह करू शकतात.