शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रथयात्रा रोखत आडवाणींना केली होती अटक, आता मिळाले मंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:57 IST

2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसऱ्या विस्तारामध्ये 9 नवीन राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे...

नवी दिल्ली, दि. 3 - आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसऱ्या विस्तारामध्ये 9 नवीन राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या 9 मंत्र्यापैकी एक राज्यमंत्री हे एकेकाळचे कडक आयएएस अधिकारी होते. त्यांनी अडवाणींच्या अयोध्या रथ यात्रेचा रथ रोखत अटकही केली होती. त्यांचं नाव आहे राजकुमार (आर.के.) सिंह. बिहारच्या आरा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी देशाचे गृहसचिवपद सांभाळले होते. विशेष म्हणजे समझोता आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी रा.स्व.संघाशी संबंधित आरोपींची नावे उघड केली होती.

64 वर्षांचे आर.के.सिंह 2013 साली केंद्रीय गृहसचिव पदावरून निवृत्त झाले. जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा सोमनाथहून निघाली होती. तेव्हा अडवाणींना बिहारमध्ये अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी दिले होते. तेव्हा समस्तीपूरचे जिल्हाधिकारी असलेल्या सिंह यांनी रथयात्रा रोखण्यात आणि अडवाणींना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

आर. के. सिंह यांनी नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेज तसेच नेदरलँडच्या आर. वी. बी. डेल्फ विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. सिंह हे मुळचे बिहारच्या सुपौल जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. ते 1975च्या बॅचचे बिहार कॅडरचे आयएएस आहेत. नोकरशाह असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा मसुदा तयार करण्याच्या कार्यातही त्यांचा समावेश होता. निवृत्त झाल्यानंतर सिंह राजकारणात सक्रीय झाले. 2014मध्ये भाजपच्या तिकीटावर ते निवडून आले.

आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. विस्तार आणि फेरबदलांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी-शहा जोडगोळीच्या धक्कातंत्राचा प्रत्यय दिसून आला आहे. सत्यपाल सिंग यांचा अपवाद वगळता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ नव्या चेहरेही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याचा कारभार मोदींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवला. या पदासाठी निर्मला सितारामन यांनी निवड अनपेक्षित ठरली. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.

सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयासोबत कौशल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण मंत्रालयासोबत वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवाक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नितीन गडकरीं यांच्याकडे गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी