शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीत उंदराने घेतला प्रवाशाचा चावा, रेल्वे डॉक्टर म्हणतात हा तर फक्त ओरखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 18:21 IST

राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल प्रवास करत असताना उंदराने चावा घेतल्याचा दावा एका प्रवाशाने केला आहे.

ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल प्रवास करत उंदराने घेतला प्रवाशाचा चावाब्रिजभूषण सूद यांच्या कानाला गंभीर जखम झाली आहे

मुंबई  -  राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल प्रवास करत असताना उंदराने चावा घेतल्याचा दावा एका प्रवाशाने केला आहे. ज्येष्ठ नागरिक असणा-या ब्रिजभूषण सूद 7 जानेवारीला प्रवास करत होते. रेल्वेत देण्यात येणा-या निकृष्ट दर्जाच्या जेवण आणि वैद्यकीय मदतीसाठी कर्मचा-यांनी केलेल्या दिरंगाईवरुन ब्रिजभूषण सूद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेन नागाडा रेल्वे स्थानकावर पोहोचण्याआधी उंदराने रात्री 11.40 वाजता ब्रिजभूषण सूद यांच्या कानाचा चावा घेतला. यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर जखम झाली आहे. 

ब्रिजभूषण सूद यांनी लगेच टीसीला यासंबंधी माहिती दिली होती. पण त्यावेळी त्यांना मदत मिळाली नाही. सूद यांनी सांगितल्यानुसार, 'रक्त वाहत असतानाही वैद्यकीय पथक आलं नव्हतं. रतलाम स्टेशन गेल्यानंतरही ते आले नाहीत. अखेर वडोदरा स्थानकात एक महिला डॉक्टर आली, पण ते नावापुरते आले होते. नागाडा ते वडोदरा दरम्यान तीन तासांच्या प्रवासात रक्त इतकं वाहत होतं की माझा हातरुमाल रक्ताने भरला होता'.

'महिला डॉक्टरने मला काही गोळ्या दिल्या पण मला ह्रदयाचा त्रास असल्याने काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता होती. मी त्यांना तसं सांगितलं होतं. पण त्यांनी मला कोणत्या गोळ्या दिल्या जातायत यामध्ये लक्ष देणं महत्वाचं नाही समजलं. त्यांनी मला कोणतं इंजेक्शनही दिलं नाही, फक्त औषधं लिहून दिली आणि मुंबईत पोहोचल्यानंतर खरेदी करायला सांगितलं. माझी कोणतीही चूक नसताना मला 500 रुपयांचं बिल सोपवण्यात आलं', असं ब्रिजभूषण सूद यांनी सांगितलं. 

ब्रिजभूषण सूद एका खासगी कंपनीत सीनिअर सेल मॅनेजर आहेत. 'एका मित्राने मला ग्रांट रोड येथील डॉक्टरकडे नेलं. त्यांनी इन्फेक्शन होऊ नये यासाठी मला इंजेक्शन दिलं. मी नेहमी राजधानीने प्रवास करतो आणि तिथे उंदिरं फिरणं काही नवं नाही. पण पहिल्यांदा मला त्यांचा त्रास झाला', असं ब्रिजभूषण सूद बोलले आहेत. 

रेल्वे डॉक्टरांनी कोणताही उंदीर चावला नसून तो फक्त ओरखडा असल्याचा दावा केला आहे. उशीवरही रक्ताचे कोणते डाग नव्हते. अंधार असल्या कारणाने मी रक्ताने माखलेला माझा रुमाल शोधू शकलो नाही असं ब्रिजभूषण सूद यांचं म्हणणं आहे. 

पश्चिम रेल्वेच चीफ पीआरओ रविंदर भाकर यांनी सांगितल्यानुसार, '5 जानेवारीला ट्रेनमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. सर्व काळजी घेण्यात आली होती'. 

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी