शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 06:58 IST

नितीश यांचे पद डळमळीत

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांना बहुमत मिळणार नाही, हे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले असून, या आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण भाजपला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीश पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे सर्वाधिक जागा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मिळविल्या असून, आमचेच सरकार येणार आणि बिहारमध्ये सत्तांतर होणार, असे राजदचे नेते ठामपणे सांगत आहेत. 

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असून रालोआ व महाआघाडी यांच्यात १० जागांचाच फरक आहे. रालोआला १२२ ते १२६ जागांवर पुढे असून, महाआघाडी ११० ते ११५ जागी आघाडीवर आहे. हाच कल कायमच राहिल्यास रालोआचे सरकार येण्यात अडचणी येणार नाहीत. पण हे कल बदलतील, असा राजदचा दावा आहे. 

नितीश कुमार यांची लोकप्रियता ओहोटीला

रालोआ आणि तेजस्वी यादव व काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये दिवसभर चुरस कायम राहिली. रात्री उशिरापर्यंत कधी या तर कधी त्याला आघाडीच्या जागा मागेपुढे होत होत्या. पण या निकालांनी एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे नितीश कुमार यांची लोकप्रियता ओहोटीला लागली आहे.  

नितीश कुमार । जदयुनितीशकुमार यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपली ही अखेरची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक आवाहन केले. त्यामुळे मतांचा लंबक जदयुकडे वळला.

तेजस्वी यादव । राजदतेजस्वी यादव यांनी मोठ्या तडफेने विधानसभा निवडणूक लढवली. त्यांच्या झंझावातामुळे नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराचा वेग वाढवावा लागला. 

चिराग पासवान । लाेजपाभाजपची ‘बी टीम’ ठरलेल्या लोक जनशक्ती पार्टीने जदयुविरोधात उमेदवार उभे केले नसते तर जदयु सर्वात मोठा पक्ष ठरला असता.

पाेटनिवडणुकीत भाजपची सरशी

भोपाळ, लखनऊ, अहमदाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच मध्य प्रदेश आणि गुजरातसह ११ राज्यांत ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांबाबतही देशभरात उत्सुकता निर्माण झाली होती. या पोटनिवडणुकांत ४० हून अधिक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने नऊहून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील सत्ता अधिक मजबूत केली आहे. 

उत्तर प्रदेशात ७ पैकी ६ जागा जिंकल्या

मध्य प्रदेशात २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने नऊ जागांवर विजय मिळवला तर अन्य १० जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. गुजरातमध्ये आठपैकी आठ जागांवर भाजपने विजय  मिळवला. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश सातपैकी सहा जागा भाजपला जिंकता आल्या.  इतर राज्यांत मणिपूर (५ जागा), हरियाणा (१), छत्तीसगड (१), झारखंड (२), कर्नाटक (२), नागालॅॅण्ड (२), ओडिशा (२) आणि तेलंगणा (१) इत्यादी जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांपैकी काँग्रेसला हरयाणातील एका जागेवर विजय मिळवता आला. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक