शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

रसगुल्ला बंगालचा की ओडिशाचा?

By admin | Updated: July 28, 2016 04:49 IST

रसगुल्ला ही एक बंगाली मिठाई म्हणून जगप्रसिद्ध असली, तरी मुळात दूध नासवून तयार केला जाणारा हा रसभरित पदार्थ कोणाचा? यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिशा

दोन राज्यांचे दावे-प्रतिदावे : ओडिशाने दिले १२व्या शतकाचे संदर्भ कोलकाता : रसगुल्ला ही एक बंगाली मिठाई म्हणून जगप्रसिद्ध असली, तरी मुळात दूध नासवून तयार केला जाणारा हा रसभरित पदार्थ कोणाचा? यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अर्थात, ही मिठाई यापैकी कोणाचीही असली, तरी अस्सल खवय्यांच्या दृष्टीने तिचा मनसोक्त आस्वाद घेण्यात काहीच फरक पडणार नाही.ओडिशाने १२ व्या शतकापासूनचे संदर्भ देत, या मिठाईचा भौगोलिक संकेत (जीआय) टॅग फक्त आपल्यालाच मिळायला हवा, असा दावा केला आहे. तर आमची रसगुल्ले बनविण्याची पद्धत व त्याची चव वेगळी असल्याने, ‘जीआय’ संकेत टॅगवर एकट्या ओडिशाला हक्क सांगता येणार नाही, असे पश्चिम बंगालचे म्हणणे आहे. ओडिशाने त्यांचा दावा चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री कार्यालयात दाखल केला आहे. त्याला उत्तर देताना प. बंगालच्या अन्नप्रक्रिया उद्योग विभागाने म्हटले आहे की, ज्या प्रकारे ही मिठाई आमच्या राज्यात तयार केली जाते, ती अन्य राज्यांपेक्षा वेगळी आहे. पश्चिम बंगालचे रसगुल्ले हे गुणवत्तेत उत्कृष्ट आहेत. पश्चिम बंगालने स्पष्ट केले आहे की, आपण या मिठाईवर कोणताही दावा करीत नाही, पण आमच्या राज्यात तयार होणाऱ्या विशेष प्रकारच्या रसगुल्लावर हक्क सांगत आहोत. (वृत्तसंस्था)चहाला दुहेरी टॅगरसगुल्ल्याचा ‘जीआय टॅग’ दोन्ही राज्यांना दिला जाऊ शकतो, याचे उदाहरण देताना प. बंगाल म्हणते की, ‘आमच्याकडे दार्जिलिंग चहा, तर हिमाचल प्रदेशकडे कांगडा चहा आहे. दोन्ही चहाच आहेत, पण त्यांची चव वेगळी आहे. दोन्हींचा जीआय टॅग होऊ शकतो.’पश्चिम बंगालच्या राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘आपण रसगुल्लावर केवळ भौगोलिक संकेतच्या (जीआय) टॅगबाबत आग्रही आहोत.’ एका अधिकाऱ्याने असेही सांगितले की, ‘याबाबत ओडिशासोबत कोणताही वाद नाही. आमच्या रसगुल्लाची जी ओळख आहे, तिची आम्ही सुरक्षा करू इच्छितो. त्यांचे उत्पादन आमच्या उत्पादनापेक्षा रंग, चव आणि बनविण्याच्या पद्धतीत वेगळे आहे.’