शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रामविलास पासवान यांचा सरकारी बंगला 32 वर्षानंतर रिकामा, पोलीस बळाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:18 IST

व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   गेल्या ३२ वर्षांपासून माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना देण्यात आलेला १२ जनपथस्थित सरकारी बंगल्याला आता छावणीचे स्वरूप आले आले. बंगल्याला पोलीस आणि निमलष्करी जवानांनी वेढा दिलेला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून  सरकारने मालमत्ता विभागाचे पथक आणि पोलीस पाठवून हा बंगला बळजबरीने रिकामा करण्यात आला.

व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला. तेव्हापासून ते याच बंगल्यात राहत होते. ८ ऑक्टोबर २०२० रोजी रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर हा बंगला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात होता.  नोव्हेंबर २०२० पर्यंत पासवान परिवार या बंगल्यात राहू शकले असते. त्यानंतर मात्र त्यांना बाजारभावानुसार घरभाडे आणि  वीज-पाणी बिलही द्यावे लागले असते. तथापि, ६ जानेवारी २०२१ रोजी मालमत्ता विभागाने रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना ६ महिन्यांच्या आत हा बंगला सोडण्यासाठी नोटीस दिली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये हा बंगला केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना वाटप करण्यात आला. 

चार दिवसांत तीन बंगले केले रिकामे...गेल्या चार दिवसांत  सरकारी तीन बंगले बळजोरीने रिकामे करण्यात आले. रामशंकर कठेरिया आणि पी. सी. सारंगी या दोन माजी मंत्र्यांचेही बंगले पोलीस पथक पाठवून रिकामे करण्यात आले. चिराग पासवान यांनी म्हटले की,  कायमचा या बंगल्यात राहणार नव्हतो. ज्या पद्धतीने बंगल्यातून आमच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस