शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

तिहेरी तलाकनंतर पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळलं, 80 टक्के भाजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 11:22 IST

उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

रामपूरः उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यानंतर तिला जिवंत जाळलं. या आगीत पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु पत्नीची परिस्थिती गंभीर असल्याचं समजल्यानंतर मुरादाबाद टीएमयूमध्ये हलवलं आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.रामपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील दौंकपुरी टांडा या गावातील ही घटना आहे. खेडा टांडाचे रहिवासी असलेल्या नजाकत अली यांनी मुलगी सीमा हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी दौंकपुरी टांडातील रहिवासी मोहम्मद आरिफशी करून दिला होता. लग्नानंतर पत्नीकडून सासरची मंडळी हुंड्याची मागणी करत असल्याची आरोप करण्यात आला आहे. रविवारी सकाळी सीमाचा सासरची मंडळी आणि पतीबरोबर भांडण झालं. त्याचदरम्यान पतीनं पत्नीला तलाक, तलाक, तलाक म्हणत तिहेरी तलाक दिला आणि तिला घरातून निघून जाण्यास सांगितलं. सीमानं जेव्हा याला विरोध केला, तेव्हा तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्यात आलं.सीमाचा आवाज ऐकून अनेक जण घटनास्थळी पोहोचले. उपस्थितांनी महिलेचा आग विझवून टाकली. तोपर्यंत विवाहिता 80 टक्के जळाली होती. शेजारील लोक पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. महिलेची परिस्थिती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. सासरच्या मंडळींच्या मागणीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अजीमनगर ठाणे प्रभारी अमरीश कुमार यांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली. लवकरच आरोपींना अटक होणार आहे.