शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 23:20 IST

Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते.

काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लाखोंची गर्दी ओसंडली होती. मंदिर प्रशासनाला रात्रंदिवस मंदिर सुरु ठेवावे लागले होते. चेंगराचेंगरी होते की काय एवढी भीषण परिस्थिती होती. यामुळे यंदा रामनवमीला १५ लाखांच्यावर रामभक्त अयोध्येत दर्शनाला येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने लावला होता. परंतु, आजच्या दिवशी अयोध्येतील रस्ते ओस पडल्याचे चित्र होते. 

राम मंदिराचा प्रभाव आजबाजुच्या राज्यांत पडेल असा राजकीय होरा होता. यामुळेच मंदिराचे काम अर्धवट असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. यावेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. तसेच ठिकठिकाणी रामभक्तांच्या गाड्या रोखाव्या लागल्या होत्या.

यानंतरची पहिलीच रामजन्मोत्सव असल्याने प्रशासनाने १५ लाख भक्त येणार असल्याचा दावा केला होता. परंतु याच्या उलट घडले आहे. अयोध्येच्या लोकांनी तर गेल्यावर्षीपेक्षा कमी गर्दी यंदाच्या रामनवमीला होती असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी होणारा रामपथ सुनासुना होता. राम मंदिराच्या मुख्य गेटजवळ असलेल्या ११ नंबरच्या गेटवर देखील मंदिरात प्रवेश करणारे भक्त कमी होते. 

आलेल्या भक्तांसाठी सात दर्शन रांगांची सोय करण्यात आली होती. यापैकी पाच रांगा रिकाम्या होत्या. रामजन्मोत्सवाच्या दिवशी भक्तांची मोठी गर्दी होत असायची. परंतु यंदाचा रामजन्मोत्सव सुनासुनाच झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. आजच्या दिवशी चांगली विक्री होईल अशा आशेने दुकानदार होते, ते देखील निराश झाले होते असे व्यापारी विजय यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Navamiराम नवमीRam Mandirराम मंदिर