शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 05:40 IST

अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे व या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलता येणार नाही, असा युक्तिवाद तेथील रामलल्ला विराजमान या देवतेच्या वतीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला गेला.वादग्रस्त २.७७ एकर जागेची तीन समान भागात वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलांवरील सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विशेष घटनापीठापुढे सुरू असलेली दैनंदिन सुनावणी सहाव्या दिवशीही अपूर्ण राहिली. बुधवारचा संपूर्ण दिवस मूळ दाव्यातील रामलल्ला या एका पक्षकाराच्या वतीने ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांचा युक्तिवाद झाला.वादग्रस्त जागा हीच रामजन्मभूमी आहे, याला पुरावे काय, ही न्यायालयाची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी अ‍ॅड. वैद्यनाथन यांनी अनेक जुन्या ग्रंथांचे आणि खास करून १६ व १७ व्या शतकात भारतात येऊन गेलेल्या विल्यम फिन्च, ब्रिटिश सर्व्हेअर मॉन्टेगोमेरी मार्टिन व जेजुईटी मिशनरी जोसेफ टिफेनथॅलर युरोपीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनांचे दाखले दिले. अयोध्येतील रामजन्मस्थानाचे उल्लेख पुराणांमध्येही आढळतात, असे त्यांनी सांगितले. वैद्यनाथन यांनी स्पष्ट केले की, हे सर्व पुरावे दाखविण्यामागे श्री राम तेथेच जन्मला याला पुष्टी देण्यासाठी नव्हे तर हिंदूंची तशी पूर्वापार श्रद्धा आहे हे अधोरेखित करणे हाच उद्देश आहे. त्यावरून या श्रद्धेचे पुरातन स्वरूप स्पष्ट होते. ही श्रद्धा वस्तुस्थिती म्हणून मान्य करावी लागेल. ती तर्काच्या तागडीत तोलता येणार नाही.वैद्यनाथन यांनी असेही सांगितले की, आता उद््ध्वस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या तीन घुमटांच्या नेमके खाली रामजन्मस्थान होते व पूर्वी त्या ठिकाणी मंदिर होते, अशीही हिंदूंची श्रद्धा आहे. ही श्रद्धा ऐकीव माहितीवर आधारलेली व पूर्णपणे निराधार म्हणता येणार नाही. कारण मशिदीचे अनेक खांब व कमानींवर कोरलेली नक्षी हिंदू शैलीची होती याचे अनेक समकालीन दाखले मिळतात.वैद्यनाथन यांच्या या युक्तिवादाच्या अनुषंगाने न्यायमूर्तींशी त्यांचे झालेले काही सवाल- जबाब असे :न्यायमूर्ती : या जागेचा ‘बाबरी मशीद’ असा उल्लेख सर्वप्रथम केव्हा केल्याचे आढळते.वैद्यनाथन : तसा उल्लेख १९ व्या शतकात केला गेल्याचे आढळते. त्याआधी या स्थानाला बाबरी मशीद म्हणून ओळखले जात असल्याचे उल्लेख नाहीत.न्यायमूर्ती : बाबर बादशहाने लिहिलेल्या ‘बाबरनाम्या’तही याचा अजिबात उल्लेख नाही?वैद्यनाथन : नाही. अजिबात नाही.न्यायमूर्ती : मग बाबराने मंदिर पाडून तेथे मशीद बांधविली, याला वस्तुनिष्ठ पुरावा काय?वैद्यनाथन : बाबर बादशाहने त्याचा सेनापती मलिक अंबर यास मशीद उद््ध्वस्त करण्याचा आदेश दिला, याचा उल्लेख आहे.च्न्यायमूर्ती : मंदिर बाबरानेच पाडले कशावरून?च्वैद्यनाथन : मंदिर बाबराने किंवा औरंगजेबाने पाडले असे दोन प्रवाद आहेत; पण ते सन १७८६ पूर्वी पाडले गेले एवढे नक्की. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय