शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 05:40 IST

अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे व या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलता येणार नाही, असा युक्तिवाद तेथील रामलल्ला विराजमान या देवतेच्या वतीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला गेला.वादग्रस्त २.७७ एकर जागेची तीन समान भागात वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलांवरील सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विशेष घटनापीठापुढे सुरू असलेली दैनंदिन सुनावणी सहाव्या दिवशीही अपूर्ण राहिली. बुधवारचा संपूर्ण दिवस मूळ दाव्यातील रामलल्ला या एका पक्षकाराच्या वतीने ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांचा युक्तिवाद झाला.वादग्रस्त जागा हीच रामजन्मभूमी आहे, याला पुरावे काय, ही न्यायालयाची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी अ‍ॅड. वैद्यनाथन यांनी अनेक जुन्या ग्रंथांचे आणि खास करून १६ व १७ व्या शतकात भारतात येऊन गेलेल्या विल्यम फिन्च, ब्रिटिश सर्व्हेअर मॉन्टेगोमेरी मार्टिन व जेजुईटी मिशनरी जोसेफ टिफेनथॅलर युरोपीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनांचे दाखले दिले. अयोध्येतील रामजन्मस्थानाचे उल्लेख पुराणांमध्येही आढळतात, असे त्यांनी सांगितले. वैद्यनाथन यांनी स्पष्ट केले की, हे सर्व पुरावे दाखविण्यामागे श्री राम तेथेच जन्मला याला पुष्टी देण्यासाठी नव्हे तर हिंदूंची तशी पूर्वापार श्रद्धा आहे हे अधोरेखित करणे हाच उद्देश आहे. त्यावरून या श्रद्धेचे पुरातन स्वरूप स्पष्ट होते. ही श्रद्धा वस्तुस्थिती म्हणून मान्य करावी लागेल. ती तर्काच्या तागडीत तोलता येणार नाही.वैद्यनाथन यांनी असेही सांगितले की, आता उद््ध्वस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या तीन घुमटांच्या नेमके खाली रामजन्मस्थान होते व पूर्वी त्या ठिकाणी मंदिर होते, अशीही हिंदूंची श्रद्धा आहे. ही श्रद्धा ऐकीव माहितीवर आधारलेली व पूर्णपणे निराधार म्हणता येणार नाही. कारण मशिदीचे अनेक खांब व कमानींवर कोरलेली नक्षी हिंदू शैलीची होती याचे अनेक समकालीन दाखले मिळतात.वैद्यनाथन यांच्या या युक्तिवादाच्या अनुषंगाने न्यायमूर्तींशी त्यांचे झालेले काही सवाल- जबाब असे :न्यायमूर्ती : या जागेचा ‘बाबरी मशीद’ असा उल्लेख सर्वप्रथम केव्हा केल्याचे आढळते.वैद्यनाथन : तसा उल्लेख १९ व्या शतकात केला गेल्याचे आढळते. त्याआधी या स्थानाला बाबरी मशीद म्हणून ओळखले जात असल्याचे उल्लेख नाहीत.न्यायमूर्ती : बाबर बादशहाने लिहिलेल्या ‘बाबरनाम्या’तही याचा अजिबात उल्लेख नाही?वैद्यनाथन : नाही. अजिबात नाही.न्यायमूर्ती : मग बाबराने मंदिर पाडून तेथे मशीद बांधविली, याला वस्तुनिष्ठ पुरावा काय?वैद्यनाथन : बाबर बादशाहने त्याचा सेनापती मलिक अंबर यास मशीद उद््ध्वस्त करण्याचा आदेश दिला, याचा उल्लेख आहे.च्न्यायमूर्ती : मंदिर बाबरानेच पाडले कशावरून?च्वैद्यनाथन : मंदिर बाबराने किंवा औरंगजेबाने पाडले असे दोन प्रवाद आहेत; पण ते सन १७८६ पूर्वी पाडले गेले एवढे नक्की. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय