शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

रामकुंडात पाणी, भाविकांना पर्वणी पालिकेकडून कार्यवाही : कोरड्या पात्राला संजीवनी

By admin | Updated: June 10, 2016 23:02 IST

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात महापालिकेने पाणी भरले आणि भाविकांनी घाटावर गर्दी करत स्नानाची पर्वणी साधली. महापालिकेने पात्रात बंधारा टाकत रामकुंडाचा विस्तार कमी केला असून, पाच लाख लिटर्स पाणीसाठवण क्षमतेचे हे पात्र आता कायमस्वरूपी पूर्णपणे भरलेले राहण्यासाठी इंद्रकुंडातून दररोज टॅँकरने पाणी आणून टाकले जाणार आहे.

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात महापालिकेने पाणी भरले आणि भाविकांनी घाटावर गर्दी करत स्नानाची पर्वणी साधली. महापालिकेने पात्रात बंधारा टाकत रामकुंडाचा विस्तार कमी केला असून, पाच लाख लिटर्स पाणीसाठवण क्षमतेचे हे पात्र आता कायमस्वरूपी पूर्णपणे भरलेले राहण्यासाठी इंद्रकुंडातून दररोज टॅँकरने पाणी आणून टाकले जाणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून गोदापात्र कोरडेठाक पडले आहे. ऐन सिंहस्थ कुंभवर्षात गोदापात्र कोरडे झाल्याने देश-विदेशांतून स्नानासाठी येणार्‍या भाविकांना निराश मनाने माघारी परतावे लागत होते. दशक्रियाविधीसाठी येणार्‍या लोकांचीही अस्थिविसर्जनासाठी गैरसोय होत होती. त्यामुळे किमान रामकुंडात पाणी कायमस्वरूपी ठेवण्याची पुरोहित संघासह भाविकवर्गाकडून सातत्याने मागणी केली जात होती. महापौरांनी सणावाराला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता खासगी टॅँकरमालकांना रामकुंडात पाणी आणून टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सुमारे ४५ ते ५० टॅँकरचालकांनी पाणी आणून ओतले होते. परंतु काही दिवसांनी शेवाळयुक्त पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने रामकुंड रिकामे करण्यात आले. रामकुंडाच्या विस्तारित पात्राची सुमारे २० लाख लिटर्स पाणी साठवण क्षमता आहे. शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी रामकुंडात सोडणे शक्य नसल्याने महापालिकेने अखेर रामकुंडाचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रामकुंडात पाच फूट उंचीचा बंधारा टाकून पाणीसाठवण क्षमता पाच लाख लिटर्सवर आणली. बंधार्‍याच्या बांधकामामुळे सुमारे महिनाभर रामकुंड कोरडेठाक होते. दरम्यान, रामकुंडात पाणी आणण्यासाठी परिसरात तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्याचाही प्रस्ताव महापालिकेने समोर आणला होता. परंतु, सदर बोअरवेलला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने प्रस्ताव बारगळला. अखेर भाविकांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने लक्ष्मणकुंडाची साफसफाई करत गुरुवारी रात्री रामकुंडात पंचवटीतील जलकुंभातून सुमारे अडीच लाख लिटर्स पाणी आणून टाकले तर उर्वरित पाणी इंद्रकुंड येथून टॅँकरने आणून ओतण्यात आले. दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात पाणी भरल्यानंतर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केल्याने गोदाघाट गजबजला होता. इन्फोभाविकांची गैरसोय दूरसिंहस्थ पर्वकाळाची सांगता ११ ऑगस्ट २०१६ रोजी होणार असून, तोपर्यंत गंगा दशहरा (५ ते १४ जून), शनिप्रदोष (२ जुलै), सोमवती अमावस्या (४ जुलै), देवशयनी एकादशी (१५ जुलै), गुरुपौर्णिमा (१९ जुलै), अमावस्या (२ ऑगस्ट), नागपंचमी (७ ऑगस्ट) आदि तिथी स्नानासाठी आहेत. त्यामुळे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने रामकुंडात पाणी भरले आहे. आता यापुढे इंद्रकुंडातून रोज टॅँकरने किमान ५० हजार लिटर्स पाणी आणून ओतले जाणार आहे. त्यामुळे रामकुंडातील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. - गुरुमित बग्गा, उपमहापौरइन्फोभाविकांमध्ये समाधानरामकुंड हे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. त्याचा लौकिक जगभर आहे. त्यामुळे रामकुंड पाण्याने भरलेले राहावे यासाठी पुरोहित संघाने महापालिकेकडे मागणी केली होती. महापालिकेने त्याबाबत कार्यवाही केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या गंगादशहरा महोत्सव सुरू आहे. त्यामुळे भाविकांना स्नानविधी करता येणे शक्य होणार आहे.- सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघइन्फोबचत केलेल्या पाण्याचाच वापररामकुंडात पाणी भरण्यासाठी जलकुंभातून केवळ अडीच लाख लिटर्स पाणी आणून टाकले आहे. त्यामुळे कुठेही कोणाला पाणीपुरवठा कमी झालेला नाही. महापालिका दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवत असल्याने ३० कोटी लिटर्स पाण्याची बचत होत आहे. त्यातूनच पाणी वापर झालेला आहे. देश-विदेशातून येणार्‍या भाविकांसाठी रामकुंड पाण्याने भरणे आवश्यकच होते. आता यापुढे इंद्रकुंडातून तसेच खासगी विहिरींतून पाणी टॅँकरने आणून ओतले जाणार आहे. - उत्तम पवार, अधीक्षक अभियंता, मनपा ---बातमीचा जोड आहे...