शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

लोकसभा निवडणुकांपर्यंत राम मंदिर आंदोलन गुंडाळले, भाजपाची अडचण टाळण्यासाठी घेतला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:07 IST

संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने लोकसभा निवडणुका होईपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित ठेवण्याचे जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी प्रयागराजच्या धर्मसंसदेत २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याची घोषणा केल्यानंतर आता संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने लोकसभा निवडणुका होईपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित ठेवण्याचे जाहीर केले आहे.लोकसभा निवडणुकांनंतर नवे सरकार आल्यावरच राम मंदिराबाबत नव्याने रणनीती ठरवली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. त्यामुळे पुढील चार महिने ही संघटना राम मंदिरासाठी कोणतेही आंदोलन करणार नाही.लोकसभा निवडणुकांत भाजपा व मोदी सरकारची अडचण होऊ नये, यासाठीच विश्व हिंदू परिषदेने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राम मंदिरासाठी विहिंप व संघ परिवारातील सर्व संघटना अतिशय आक्रमक होत्या. त्यासाठी देशातील सर्व खासदारांच्या भेटी परिषदेच्या नेत्यांनी घेतल्या आणि ठिकठिकाणी सभांचेही आयोजन केले. असे असूनही विश्व हिंदू परिषदेने आपला निर्णय बदलला आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा नव्हे, तर आमच्या आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळेच राम मंदिर हा लोकसभा निवडणुकांत मुद्दा बनू नये, अशी इच्छाही विहिंपने अचानकपणे व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने अयोध्येतील ६७ एकर जमीन विहिंपप्रणित राम मंदिर न्यासाला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून संमतीही मागितली आहे. त्याचा निर्णय व्हायचा आहे. अशा वेळी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर आंदोलन अचानक मागे घेण्यामागे भाजपा व मोदी सरकार यांना ऐन निवडणुकीत अडचणी येऊ न देणे, हेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. एरवी, आतापर्यंत मंदिरासाठी आंदोलने करणाऱ्या संघटनेने अचानक मागे घेण्याचे कारण न समजू शकणारे आहे.शंकराचार्यांवर काँग्रेसचा शिक्काशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद हे संघ परिवारातील नाहीत. हिंदू परिषदेचे नेते जाहीरपणे नव्हे, पण खासगीत या शंकराचार्यांना काँग्रेसचे स्वामी असल्याची टीका करतात. त्यामुळेच मंदिराचे श्रेय त्यांना मिळू नये, असा विहिंपचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. या शंकराचार्यांचा रामालय ट्रस्ट असून, त्यामार्फत मंदिराचे काम व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे, तर आपल्या राम मंदिर न्यासामार्फंत मंदिर बनवून त्याचा फायदा भाजपाला व्हावा, अशी विश्व हिंदू परिषदेची इच्छा आहे.दोन आठवड्यांपूर्वी शंकराचार्य स्वामी शंकरानंद यांनी धर्मसंसदेमध्ये २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी १0 फेब्रुवारीला अयोध्येकडे मार्च करण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. तेव्हा उपस्थित सर्व संत-महंतांनी त्या घोषणेचे स्वागत केले होते. मंदिर बांधून होईपर्यंत हिंदू गप्प बसणार नाहीत, असे सर्वांनी त्यावेळी स्पष्टपणे म्हटले होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर