शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 18:39 IST

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल, असा दावा केला जात आहे.

Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तर राम मंदिरात आल्यावर भाविक सढळ हस्ते दान, देणगी देत आहेत. अल्पावधीच कोट्यवधींचे दान राम मंदिराला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत तिरुपती बालाजी देवस्थानाचा विक्रम मोडला जाईल का, अशी चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. 

रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यापासून एका महिन्यात १०० कोटींपेक्षा अधिकचे दान प्राप्त झाले आहे. भाविकांनी धनादेश किंवा पावतीद्वारे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अर्पण केलेले हे दान आहे. तर, दानपेटी आणि ऑनलाइन बँक खात्यावर पाठवलेली रक्कम वेगळी आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष  महंत गोविंद देवगिरी महाराज यांनी याबाबत सांगितले की, १९ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत ५० कोटींहून अधिक रुपये भाविकांनी दान-देणग्या दिल्या आहेत. अलीकडेच जमशेदपूर, झारखंड येथील एका कंपनीने रामललाला ११ कोटी रुपये अर्पण केले. 

राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल

तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वांत समृद्ध मानले जाते. या मंदिरात दरवर्षी भाविक सुमारे ६५० कोटींहून अधिकची देणगी देतात. म्हणजे एका महिन्यात सुमारे ५४ कोटींपेक्षा जास्त दान, देणगी मिळते, अशी माहिती आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दरवर्षी ६३० कोटींचे दान दिले जाते. जम्मूमधील श्री माता वैष्णोदेवी मंदिराला वर्षभरात ५०० कोटींच्या देणग्या मिळतात. केरळच्या त्रिवेंद्रममधील पद्मनाभस्वामी मंदिराला वर्षभरात ५०० कोटींच्या देणग्या प्राप्त होतात. एका महिन्यात राम मंदिरात मिळालेल्या देणग्या या समृद्ध मंदिरांमध्ये मिळालेल्या दानाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. असेच सुरू राहिल्यास राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल, असा दावा केला जात आहे. 

दरम्यान, प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी मुक्त हस्ते सोने-चांदीही अर्पण केले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात २५ किलो चांदी आणि १० किलो सोने भक्तांनी रामलला यांना अर्पण केले आहे. या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, हार, छत्री, रथ, बांगड्या, याशिवाय इतर वस्तूंमध्ये खेळणी, दिवे, उदबत्ती स्टँड, धनुष्यबाण यांचा समावेश आहे. भाविकांनी सोन्या-चांदीची भांडी आणि रत्न अर्पण केली आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटshirdiशिर्डी