शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यात रालोआचे राहिले नाही अस्तित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 06:42 IST

भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे

व्यंकटेश केसरनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) पंजाबमध्ये संयुक्तिक असली, तरी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात ती अप्रासंगिक ठरत आहे. या चारही राज्यांत पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) नेते सुखदेव सिंग धिंडसा यांच्यासोबत जागा वाटपाची घोषणा करताना भाजपने ही आघाडी आमच्या नेतृत्वाखाली असल्याचे स्पष्ट केले होते. पंजाबमध्ये भाजप ६५ जागा लढवत आहे, तर पंजाब लोक काँग्रेस ३५ आणि धिंडसा यांचा पक्ष १५ जागा लढवत आहे. पंजाबमध्ये भाजप हा अकाली दलाचा कनिष्ठ भागीदार होता; परंतु आता तो स्वत:ला वरिष्ठ सहकारी असल्याचे दाखवत आहे. राज्यात रालोआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणलेला नाही.

भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे. उत्तर प्रदेशचा विचार केला तर भाजपने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जिंकली ती रालोआच्या प्रयोगामुळे नव्हे, तर धार्मिक ध्रुवीकरण आणि जातींचे जुळवलेले गणित यामुळे.बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) नेते नितीश कुमार यांना आपल्या पक्षाचा विस्तार शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये करण्याची इच्छा आहे ती निवडणुकीच्या आधी भाजपशी युती करून. परंतु, चतुर भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मंडलवादी पक्षाला जागा देणे म्हणजे स्वत:ला दुबळे करून घेणे होय याची जाणीव झाल्यावर त्यांना नकार दिला. 

भाजपने रालोआच्या झेंड्याखाली हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली विधानसभा निवडणूक कधीही लढवलेली नाही; परंतु झारखंड, तामिळनाडूत रालोआच्या नावाखाली निवडणूक लढला आहे.

‘आप’ उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न    मुझफ्फरपूर : मिरणपूर विधानसभा मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार जाेगिंदरसिंग उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे निराशेच्या भावनेतून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.     त्यांनी राॅकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पाेलिसांनी त्यांना राेखले. उमेदवारी अर्ज भरताना झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली नाही, असा आराेप सिंग यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२