शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

टिकैत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, "भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेबाहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 14:26 IST

Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन

ठळक मुद्देगेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन पुढील लक्ष्य संसंदेत पिकांची विक्री, टिकैत यांचं वक्तव्य

गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यादरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आंदोलन अधिक मोठं करण्यासाठी निरनिराळ्या राज्यांमध्ये महापंचायतींचं आयोजन करत आहेत. नुकताच टिकैत यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या ठिकाणी त्यांनी भाजप सोडून अन्य कोणत्या पर्यायांना मत देण्याचं आवाहन केलं. तसंच यावेळी त्यांनी भाजप हा फसवणूक करणारा पक्ष असून आपलं पुढील ध्येय संसदत मंडई सुरू करणं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं."ज्या दिवशी संयुक्त मोर्चा निर्णय घेईल. त्या दिवशी संसदेच्या बाहेर नवी मंडई उघडली जाईल," असं टिकैत म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी दिल्लीत पुन्हा ट्रॅक्टर शिरणार असल्याचा दावाही केला. आमच्याकडे ३.५ लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख शेतकरी आहेत. आमचं पुढील लक्ष्य संसंदेत पिकांची विक्री करण्याचं असल्याचंही ते म्हणाले. मेधा पाटकर यांच्यासह केलं संबोधितराकेश टिकैत जेव्हा कोलकात्यात पोहोचले त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर टिकैत यांनी शहरात आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदिग्राम येथे सामाजिक कार्यकर्त्या मधा पाटकर यांच्यासह शेतकऱ्यांना संबोधित केलं. "भाजप सरकार शेतकरी आणि शेतकरी आंदोलनाचा कणा तोडण्याचे प्रयत्न करत आहे. हे जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. भाजपला मत देऊ नका. जर त्यांना मत दिलं तर ते तुमची जमिन मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना देऊन टाकतील. ते तुमची उपजीविका धोक्यात टाकतील. देशातील उद्योगपतींच्या समूहाला तुमच्या जमिनी देतील आणि तुम्हाला धोक्यात टाकतील," असंही टिकैत यावेळी म्हणाले.फसवणूक करणारा पक्ष"भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे. आम्ही भाजपचा विरोध करणाऱ्यांसोबत आणि शेतकरी, गरीबांसोबत उभे राहणाऱ्यांसोबत आहोत," असं ते म्हणाले. परंतु पश्चिम बंगालमध्ये शेतकरी महापंचायत आयोजित करण्याचा अर्थ कोणत्याही पक्षाला समर्थन देणं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण या ठिकाणी कोणत्याही विशेष पक्षासाठी मतं मागण्यासाठी आलो नाही. आपण  बंगालच्या शेतकऱ्यांकडून भाजपच्या विरोधात लढाई सुरू करण्यासाठी आव्हान करण्यास आल्याचं टिकैत यांनी नमूद केलं. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१tmcठाणे महापालिकाMedha Patkarमेधा पाटकरwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्लीParliamentसंसदFarmerशेतकरी