शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

टिकैत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, "भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेबाहेर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 14:26 IST

Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन

ठळक मुद्देगेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन पुढील लक्ष्य संसंदेत पिकांची विक्री, टिकैत यांचं वक्तव्य

गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यादरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आंदोलन अधिक मोठं करण्यासाठी निरनिराळ्या राज्यांमध्ये महापंचायतींचं आयोजन करत आहेत. नुकताच टिकैत यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या ठिकाणी त्यांनी भाजप सोडून अन्य कोणत्या पर्यायांना मत देण्याचं आवाहन केलं. तसंच यावेळी त्यांनी भाजप हा फसवणूक करणारा पक्ष असून आपलं पुढील ध्येय संसदत मंडई सुरू करणं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं."ज्या दिवशी संयुक्त मोर्चा निर्णय घेईल. त्या दिवशी संसदेच्या बाहेर नवी मंडई उघडली जाईल," असं टिकैत म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी दिल्लीत पुन्हा ट्रॅक्टर शिरणार असल्याचा दावाही केला. आमच्याकडे ३.५ लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख शेतकरी आहेत. आमचं पुढील लक्ष्य संसंदेत पिकांची विक्री करण्याचं असल्याचंही ते म्हणाले. मेधा पाटकर यांच्यासह केलं संबोधितराकेश टिकैत जेव्हा कोलकात्यात पोहोचले त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर टिकैत यांनी शहरात आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदिग्राम येथे सामाजिक कार्यकर्त्या मधा पाटकर यांच्यासह शेतकऱ्यांना संबोधित केलं. "भाजप सरकार शेतकरी आणि शेतकरी आंदोलनाचा कणा तोडण्याचे प्रयत्न करत आहे. हे जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. भाजपला मत देऊ नका. जर त्यांना मत दिलं तर ते तुमची जमिन मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना देऊन टाकतील. ते तुमची उपजीविका धोक्यात टाकतील. देशातील उद्योगपतींच्या समूहाला तुमच्या जमिनी देतील आणि तुम्हाला धोक्यात टाकतील," असंही टिकैत यावेळी म्हणाले.फसवणूक करणारा पक्ष"भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे. आम्ही भाजपचा विरोध करणाऱ्यांसोबत आणि शेतकरी, गरीबांसोबत उभे राहणाऱ्यांसोबत आहोत," असं ते म्हणाले. परंतु पश्चिम बंगालमध्ये शेतकरी महापंचायत आयोजित करण्याचा अर्थ कोणत्याही पक्षाला समर्थन देणं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण या ठिकाणी कोणत्याही विशेष पक्षासाठी मतं मागण्यासाठी आलो नाही. आपण  बंगालच्या शेतकऱ्यांकडून भाजपच्या विरोधात लढाई सुरू करण्यासाठी आव्हान करण्यास आल्याचं टिकैत यांनी नमूद केलं. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१tmcठाणे महापालिकाMedha Patkarमेधा पाटकरwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्लीParliamentसंसदFarmerशेतकरी