शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:24 IST

वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्णवादग्रस्त कृषी कायद्यांवर अद्यापही तोडगा नाहीशेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केले आहे. (rakesh tikait says fight against farm laws will continue until solution on 100 days of farmers protest)

०६ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काळे झेंडे दाखवणे आणि केएमपी एक्स्प्रेस वे जाम करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी सकाळी राकेश टिकैत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. 

शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस.. तोडगा निघेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार, असे ट्विट शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत देशभरातील विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचयातींना संबोधित करून देशभरातून शेतकरी आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा मिळावा, यासाठी राकेश टिकैत प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. 

कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

दरम्यान, केंद्रीय कृषी कायदे शेती आणि शेतकरी विरोधी असून, ते मागे घ्यावे, या मागणीवर शेतकरी अद्यापही ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सुचवाव्यात, त्यात आवश्यक बदल करू. मात्र, कृषी कायदे मागे घेणार नाही, यावर केंद्र सरकार ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण