शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जंतरमंतरवर शेतकऱ्यांची ‘किसान संसद’; शेती करणे व संसद चालवणे दोन्ही शेतकऱ्यांना जमते: टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 07:17 IST

जे खासदार संसदेत शेतकऱ्यांचा आवाज दाबतील त्यांची गाठ शेतकऱ्यांसोबत आहे, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी जंतरमंतरवर दिला.

विकास झाडे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना शेती कशी करावी हे सांगण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे त्यांना संसद चालविण्याचे तंत्रही माहिती आहे. जे खासदार संसदेत शेतकऱ्यांचा आवाज दाबतील त्यांची गाठ शेतकऱ्यांसोबत आहे, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी जंतरमंतरवर दिला. शेतकऱ्यांनी किसान संसद भरवून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

केंद्र सरकारने लादलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी गुरुवारी जंतरमंतरवर निदर्शने केली. गेल्या आठ महिन्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्यांपैकी २०० शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आयोजित निदर्शनामध्ये सहभाग नोंदवला. दररोज २०० शेतकरी इथे येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारणार आहेत. सीमेवर आंदोलन करणाऱ्या मर्यादित शेतकऱ्यांना अथक प्रयत्नानंतर जंतरमंतरवर येण्याची परवानगी दिल्याने आता सीमेवरील आंदोलक शेतकरी समजतात, असे चिमटे टिकैत यांनी सरकारला काढले. ९ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या २३८ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर असलेल्या आंदोलकांनी गुरुवारी जंतरमंतरवर हजेरी लावली.  दुपारी १ वाजता ‘किसान संसद’ सुरू झाली. संसद सुूरू होण्यापूर्वी आंदोलनात आतापर्यंत शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यात आली. शेतकरी नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

शेतकरी मूर्ख नाहीत : योगेंद्र यादव

शेतकरी मूर्ख नाहीत, हेच दाखवून देण्यासाठी शेतकरी जंतरमंतरवर आले आहेत. ब्रिटेनच्या संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. परंतु, केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करायला वेळ नाही, असा आरोप शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी केला.

शेतकऱ्यांसोबत चर्चेस तयार : तोमर

सरकार शेतकरी आंदोलकांसोबत चर्चा करण्यास तयार आहे. परंतु शेती सुधारणा कायदे अत्यंत आवश्यक असून, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. शेतकरी या कायद्यांसंबंधी आक्षेप नोंदवतील तर सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्लीJantar Mantarजंतर मंतर