शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

UP Election 2022: “भाजपचे योगी सरकार बोलबच्चन, त्यांच्या प्रवचनांवर विश्वास ठेऊ नये”: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:20 IST

UP Election 2022: हिंदू-मुस्लीम आणि जिनांचे भूत केवळ अडीच महिन्यांपर्यंत राहील, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

अलीगड: उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) पक्षांतरासह राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप आणि योगी सरकारवर टीका केली आहे. योगी सरकारची फक्त प्रवचन सुरू आहेत. त्यांच्या बोलण्यात येऊ नये, असा टोला राकेश टिकैत यांनी लगावला आहे. 

गेल्या १३ महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांची एकप्रकारे ट्रेनिंगच सुरू आहे. याहीनंतर आता आमची भूमिका काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत असेल, तर त्या ट्रेनिंगचा काही उपयोग झाला नाही, असेच म्हणावे लागेल. अर्ध्या किमतीत उत्पादने विकून निवडणुकांच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. या लोकांना केवळ राजकारण करायचे आहे, असा टोला लगावण्यात आला. 

हिंदू-मुस्लिम आणि जिनांचा मुद्दा अडीच महिन्यांपर्यंत चालेल

देशात आता हिंदू-मुस्लिम आणि जिनांचे मुद्दे उपस्थित केले जात आहे. मात्र, हे केवळ अडीच महिन्यांपर्यंत चालेल. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हाती आले की, या सगळ्या गोष्टी बंद होतील, असा दावाही राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच आम्हाला माहिती आहे सरकार कोणाचे येणार आहे. जनता मात्र या लोकांना मतदान करणार नाही, असेही राकेश टिकैत म्हणाले. शेतकऱ्यांनी प्रवचन करणाऱ्यांपासून दूर राहावे. ३१ तारखेला आम्ही विरोध प्रदर्शन करणार आहोत, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला आहे.

दरम्यान, एका सर्वेक्षणातून मतदारांची मन की बात समोर आली आहे. योगी सरकारवर नाराज आहात आणि ते बदलण्याची इच्छा आहे का, या प्रश्नाला ४७ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे. तर सरकारच्या कामकाजावर नाराज आहोत, पण ते बदलण्याची गरज वाटत नाही, असे मत २७ टक्के लोकानी व्यक्त केले. सरकारवर नाराज नाही, त्यामुळे ते बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत २६ टक्के लोकांचं आहे.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२rakesh tikaitराकेश टिकैत