शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:45 IST

Farmers Protest: ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला राकेश टिकैत यांनी लगावला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वीदेशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावरकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० ते ११ महिन्यांपासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्रातील मोदी सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यातच सोमवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तरेकडील काही राज्ये वगळता याचा फारसा परिणाम दिसला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. (rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस, शिवसेना यासह अन्य पक्षांनी शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दर्शवला होता. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ८०० ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडले. काही ठिकाणी दुकाने खुली होती. मात्र, आंदोलनाची प्रभाव कमी झाला नाही. आंदोलन यशस्वी ठरले, अशी माहिती देत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा रद्द न करण्याच्या अटीवर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यात बदल करू असेही म्हटले आहे. सरकारने आधीच ठरवून ठेवले असेल, तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

“आदित्य ठाकरेचा अभिमान, डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार”: CM उद्धव ठाकरे

BJP वाल्यांकडून ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली

भाजपवाल्यांनी यापूर्वी ‘भारत बंद’ची हाक काहीवेळा दिली होती. ते खूपच हुशार, ज्ञानी आहेत. त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची संकल्पना मिळाली, असा टोला लगावत आम्ही कुठेही सीलबंद आंदोलन केले नाही. सामान्य नागरिकांना, वाहनांना ये-जा करण्याची मुभा दिली होती. कोणाचीही अडवणूक केली नाही. ‘भारत बंद’ शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडले, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलन केवळ तीन राज्यांचे नसून, संपूर्ण देशाचे आहे, असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

“अन्यथा गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळवता आला नसता, देशाची प्रतिष्ठा वाढली”

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वी झाला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला, असा दावा राकेश टिकैत यांनी ‘भारत बंद’ संपल्यानंतर  केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण