शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:45 IST

Farmers Protest: ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला राकेश टिकैत यांनी लगावला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वीदेशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावरकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० ते ११ महिन्यांपासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्रातील मोदी सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यातच सोमवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तरेकडील काही राज्ये वगळता याचा फारसा परिणाम दिसला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. (rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस, शिवसेना यासह अन्य पक्षांनी शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दर्शवला होता. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ८०० ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडले. काही ठिकाणी दुकाने खुली होती. मात्र, आंदोलनाची प्रभाव कमी झाला नाही. आंदोलन यशस्वी ठरले, अशी माहिती देत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा रद्द न करण्याच्या अटीवर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यात बदल करू असेही म्हटले आहे. सरकारने आधीच ठरवून ठेवले असेल, तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

“आदित्य ठाकरेचा अभिमान, डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार”: CM उद्धव ठाकरे

BJP वाल्यांकडून ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली

भाजपवाल्यांनी यापूर्वी ‘भारत बंद’ची हाक काहीवेळा दिली होती. ते खूपच हुशार, ज्ञानी आहेत. त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची संकल्पना मिळाली, असा टोला लगावत आम्ही कुठेही सीलबंद आंदोलन केले नाही. सामान्य नागरिकांना, वाहनांना ये-जा करण्याची मुभा दिली होती. कोणाचीही अडवणूक केली नाही. ‘भारत बंद’ शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडले, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलन केवळ तीन राज्यांचे नसून, संपूर्ण देशाचे आहे, असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

“अन्यथा गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळवता आला नसता, देशाची प्रतिष्ठा वाढली”

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वी झाला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला, असा दावा राकेश टिकैत यांनी ‘भारत बंद’ संपल्यानंतर  केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण