शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:45 IST

Farmers Protest: ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला राकेश टिकैत यांनी लगावला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वीदेशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावरकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० ते ११ महिन्यांपासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्रातील मोदी सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यातच सोमवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तरेकडील काही राज्ये वगळता याचा फारसा परिणाम दिसला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. (rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस, शिवसेना यासह अन्य पक्षांनी शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दर्शवला होता. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ८०० ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडले. काही ठिकाणी दुकाने खुली होती. मात्र, आंदोलनाची प्रभाव कमी झाला नाही. आंदोलन यशस्वी ठरले, अशी माहिती देत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा रद्द न करण्याच्या अटीवर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यात बदल करू असेही म्हटले आहे. सरकारने आधीच ठरवून ठेवले असेल, तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

“आदित्य ठाकरेचा अभिमान, डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार”: CM उद्धव ठाकरे

BJP वाल्यांकडून ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली

भाजपवाल्यांनी यापूर्वी ‘भारत बंद’ची हाक काहीवेळा दिली होती. ते खूपच हुशार, ज्ञानी आहेत. त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची संकल्पना मिळाली, असा टोला लगावत आम्ही कुठेही सीलबंद आंदोलन केले नाही. सामान्य नागरिकांना, वाहनांना ये-जा करण्याची मुभा दिली होती. कोणाचीही अडवणूक केली नाही. ‘भारत बंद’ शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडले, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलन केवळ तीन राज्यांचे नसून, संपूर्ण देशाचे आहे, असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

“अन्यथा गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळवता आला नसता, देशाची प्रतिष्ठा वाढली”

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद यशस्वी झाला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला, असा दावा राकेश टिकैत यांनी ‘भारत बंद’ संपल्यानंतर  केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण