शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Rajya Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली; थोड्याच वेळात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 22:26 IST

मागील ५ तासांपासून ही मतमोजणी रखडलेली होती. त्यानंतर आत्ताच केंद्रीय निवडणूक आयोगाची दीड तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. भाजपाने मविआचे नेते जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्यावर आक्षेप घेत निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला. 

मागील ५ तासांपासून ही मतमोजणी रखडलेली होती. त्यानंतर आत्ताच केंद्रीय निवडणूक आयोगाची दीड तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत मविआ आणि भाजपा यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांवर चर्चा झाली. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचीही ऑनलाईन उपस्थित होती. निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर आता थोड्याच वेळात निर्णय येण्याची अपेक्षा आहे. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?मी मतदान करून माझ्या पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांनाच मतपत्रिका दाखवली. कागद माझ्या छातीवर होता. कॅमेरा माझ्या मागे होता. मतपत्रिका बंद केली, मतदान केले आणि गेटवर आलो. तोपर्यंत कुणीही आक्षेप घेतला नव्हता. अर्ध्या तासाने माझ्या मतदानावर आक्षेप घेतल्याचं कळालं. मी कुठलाही गुन्हा केलाय असं मला वाटत नाही. काहीही कारण नसताना हा खेळ लांब घेऊन निघाले आहेत. काहीतरी रडीचा डाव खेळायचा असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर केला. 

 

निवडणूक आयोगाने मागवले होते व्हिडीओनिवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडीओ मागवले होते. शिवसेनेचा आरोप होता की, आमदार रवी राणा यांनी मतदानावेळी त्यांच्यासोबत हनुमान चालीसा आणली होती. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येही हे स्पष्ट दिसते. निवडणूक प्रक्रियेचा हा भंग आहे. निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात आहे असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग