शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: लोकसभेनंतर आता राज्यसभेतही भाजपचा मुस्लिम चेहरा नाही, मुख्तार नक्वींचे मंत्रिपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:56 IST

Rajya Sabha Election: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, एमजे अकबर आणि सैय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ संपत आला आहे. पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिलेली नाही.

Rajya Sabha Election: देशातील विविध राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेच्या 22 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, मात्र पक्षाने एकाही मुस्लिम चेहऱ्याला यावेळेस उमेदवारी दिलेली नाही. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी ते एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या सुरुवातीला संपत आहे. अशा परिस्थितीत भाजपने तीनपैकी एकाही मुस्लिम नेत्याला पुन्हा संधी दिलेली नाही, त्यामुळे लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही भाजपचा एकही मुस्लिम चेहरा दिसणार नाही.

सध्या लोकसभेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही, पण राज्यसभेत पक्षाचे तीन मुस्लिम चेहरे आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी मंत्री एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम. यापैकी अकबर यांचा कार्यकाळ 29 जून 2022 रोजी संपत आहे, तर नक्वी यांचा कार्यकाळ 7 जुलै आणि सय्यद जफर इस्लामचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपणार आहे. जफर इस्लाम हे दोन वर्षांपूर्वी यूपीतून पोटनिवडणुकीत निवडून आले होते. एमजे अकबर मध्य प्रदेशातून आणि मुख्तार अब्बास नक्वी झारखंडमधून राज्यसभेत पोहोचले.

भाजपच्या तीनही मुस्लिम राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ महिनाभरात संपणार आहे, त्यामुळे त्यांच्या जागांवर निवडणूक होत आहे. भाजपने तीनपैकी एकाही मुस्लिम नेत्याला राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेली नाही. अशा परिस्थितीत मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. नक्वी पुन्हा संसदेत पोहोचले नाहीत, तर सहा महिन्यांत त्यांचे मंत्रीपद जाणार आहे. अशा स्थितीत भाजप त्यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत उतरवण्याची राजकीय शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे मुस्लिम चेहरे किती प्रभावी?भाजपमधील मुस्लिम चेहरे अटल सरकारपासून मोदींपर्यंत मंत्री होते, पण ते त्यांचा राजकीय प्रभाव सोडू शकले नाहीत. नक्वी पहिल्यांदाच लोकसभा जिंकले आणि 1998 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री बनले, परंतु तेव्हापासून ते अल्पसंख्याक मंत्र्यापुरते मर्यादित राहिले. शाहनवाज हुसेन यांनी आता राष्ट्रीय राजकारणातून बिहारच्या राजकारणाकडे वाटचाल केली आहे. सध्या ते बिहारमधील जेडीयू-भाजपच्या संयुक्त सरकारमध्ये उद्योगमंत्री आहेत. शाहनवाज हुसेन यांना नक्वींप्रमाणेच अटल सरकारमध्ये महत्त्व मिळाले असले तरी ते मोदींच्या राजवटीत दुर्लक्षित राहिले.

एमजे अकबर यांना राज्यसभा सदस्य करून परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अकबर यांचा राजकीय प्रभाव होता, पण मी-टूमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर त्यांची मंत्रीपदाची खुर्चीही गेली आणि राजकीयदृष्ट्या बाजूलाही झाली. नजमा हेपतुल्ला यांना 2014 मध्ये अल्पसंख्याक व्यवहारांसाठी कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना राज्यपाल करण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा