शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Rajya Sabha Election: लोकसभेनंतर आता राज्यसभेतही भाजपचा मुस्लिम चेहरा नाही, मुख्तार नक्वींचे मंत्रिपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:56 IST

Rajya Sabha Election: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, एमजे अकबर आणि सैय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ संपत आला आहे. पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिलेली नाही.

Rajya Sabha Election: देशातील विविध राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेच्या 22 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, मात्र पक्षाने एकाही मुस्लिम चेहऱ्याला यावेळेस उमेदवारी दिलेली नाही. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी ते एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या सुरुवातीला संपत आहे. अशा परिस्थितीत भाजपने तीनपैकी एकाही मुस्लिम नेत्याला पुन्हा संधी दिलेली नाही, त्यामुळे लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही भाजपचा एकही मुस्लिम चेहरा दिसणार नाही.

सध्या लोकसभेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही, पण राज्यसभेत पक्षाचे तीन मुस्लिम चेहरे आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी मंत्री एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम. यापैकी अकबर यांचा कार्यकाळ 29 जून 2022 रोजी संपत आहे, तर नक्वी यांचा कार्यकाळ 7 जुलै आणि सय्यद जफर इस्लामचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपणार आहे. जफर इस्लाम हे दोन वर्षांपूर्वी यूपीतून पोटनिवडणुकीत निवडून आले होते. एमजे अकबर मध्य प्रदेशातून आणि मुख्तार अब्बास नक्वी झारखंडमधून राज्यसभेत पोहोचले.

भाजपच्या तीनही मुस्लिम राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ महिनाभरात संपणार आहे, त्यामुळे त्यांच्या जागांवर निवडणूक होत आहे. भाजपने तीनपैकी एकाही मुस्लिम नेत्याला राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेली नाही. अशा परिस्थितीत मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. नक्वी पुन्हा संसदेत पोहोचले नाहीत, तर सहा महिन्यांत त्यांचे मंत्रीपद जाणार आहे. अशा स्थितीत भाजप त्यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत उतरवण्याची राजकीय शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे मुस्लिम चेहरे किती प्रभावी?भाजपमधील मुस्लिम चेहरे अटल सरकारपासून मोदींपर्यंत मंत्री होते, पण ते त्यांचा राजकीय प्रभाव सोडू शकले नाहीत. नक्वी पहिल्यांदाच लोकसभा जिंकले आणि 1998 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री बनले, परंतु तेव्हापासून ते अल्पसंख्याक मंत्र्यापुरते मर्यादित राहिले. शाहनवाज हुसेन यांनी आता राष्ट्रीय राजकारणातून बिहारच्या राजकारणाकडे वाटचाल केली आहे. सध्या ते बिहारमधील जेडीयू-भाजपच्या संयुक्त सरकारमध्ये उद्योगमंत्री आहेत. शाहनवाज हुसेन यांना नक्वींप्रमाणेच अटल सरकारमध्ये महत्त्व मिळाले असले तरी ते मोदींच्या राजवटीत दुर्लक्षित राहिले.

एमजे अकबर यांना राज्यसभा सदस्य करून परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अकबर यांचा राजकीय प्रभाव होता, पण मी-टूमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर त्यांची मंत्रीपदाची खुर्चीही गेली आणि राजकीयदृष्ट्या बाजूलाही झाली. नजमा हेपतुल्ला यांना 2014 मध्ये अल्पसंख्याक व्यवहारांसाठी कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना राज्यपाल करण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा