शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत होऊ शकले नाही सादर, राज्यसभा 2 जानेवारीपर्यंत स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:41 IST

तिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही.

ठळक मुद्देतिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून भाजपाला धारेवर धरलं.मोठा गदारोळ झाल्यानं 2 जानेवारीपर्यंत स्थगित

नवी दिल्ली- तिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर करण्यात येणार होतं. राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून भाजपाला धारेवर धरलं. ते म्हणाले, आम्ही विधेयक मंजूर करू, पण पहिल्यांदा ते संसदीय निवड समितीकडे पाठवावे. कारण या विधेयकातील तरतुदीचा सखोल अभ्यास व्हायला हवा. त्यानंतर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीही सांगितलं की, प्रस्तावावरील चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. परंतु विरोधकांनी विधेयकाला विरोध करू नये, त्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. या गदारोळामुळेच उपसभापती हरिवंश सिंह यांनी 2 जानेवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यसभा स्थगित केली आहे. ‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार होते, परंतु ते सादर केलेले नाही. तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नसल्याचंही काँग्रेसनं आधीच स्पष्ट केलं होतं. सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार होते. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने 245, तर विरोधात 11 मते पडली होती.रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला आहे की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल. अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. 10 विरोधी पक्ष लोकसभेत या विधेयकाविरुद्ध समोर आले होते, असेही ते म्हणाले. तथापि, अण्णाद्रमुकसह जे पक्ष विविध मुद्द्यांवर सरकारचे समर्थन करीत होते, त्यांनीही या विधेयकाला विरोध केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. विरोधकांनी ट्रिपल तलाकच्या तरतुदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभा