शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक...", राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:35 IST

"हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत."

राज्य सभेत संविधानावरील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी मतदार यादीतून नाव कापल्या गेल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. तसेच, त्यांच्या कारागृहात जाण्यासंदर्भात झालेल्या टिप्पणीवरही त्यांनी भाष्य केले. जेव्हा सत्ता बदलेल, तेव्हा कुणीही बाहेर राहणार नाही. केवळ तीन तासांसाठी ईडी-सीबीआय द्या. सर्वांना कारागृहात पाठवेन, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.

संजय सिंह यांनी दिल्ली निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव कपल्या गेल्याच्या मुद्दावरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "तुघलकाबाद येथील बूथवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मतदारांची नावे कापवली आहेत." यावर सभागृह नेते जेपी नड्डा म्हणाले, "ज्यांची नावे काढली जात आहेत, ते बांगलादेशी-रोहिंग्या तर नाहीत ना, ही बघण्यासारखी गोष्ट आहे." यानंतर संजय सिंह यांनी, "राम सिंह यांच्यासह अनेक मतदारांची नावे वाचून दाखवली आणि पूर्वांचली बांधवांना रोहिंग्या-बांगलादेशी म्हणण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?" असा सवालही केला. 

"आमचे पूर्वांचली बांधव कष्ट करतात, घाम गाळतात. ते यांचे डिपॉझिट जप्त करतील. त्यांना घोटाळ्यातून निवडणूक जिंकायची आहे. मात्र ही चाल दिल्लीत चालणार नाही. त्यांना निवडणूक निपटवायची आहे. निवडणुकीतच गडबड केली तर संविधान कसे वाचणार?" असा प्रश्नही संजय सिंह यांनी केला.

मशिदींमधील सर्वेक्षणावरूनही साधला निशाणा -देशातील मशिदींमधील सर्वेक्षणासंदर्भात बोलताना आम आदमी पार्टी नेते संजय सिंह म्हणाले, "आम्ही लोक देवाच्या दर्शनासाठी अयोध्या-काशी येथे जातो. मात्र, भाजपच्या लोकांना जेव्हा दर्शन करायचे असते, तेव्हा ते, मशिदीत जातात. हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत."

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा