शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक...", राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:35 IST

"हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत."

राज्य सभेत संविधानावरील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी मतदार यादीतून नाव कापल्या गेल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. तसेच, त्यांच्या कारागृहात जाण्यासंदर्भात झालेल्या टिप्पणीवरही त्यांनी भाष्य केले. जेव्हा सत्ता बदलेल, तेव्हा कुणीही बाहेर राहणार नाही. केवळ तीन तासांसाठी ईडी-सीबीआय द्या. सर्वांना कारागृहात पाठवेन, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.

संजय सिंह यांनी दिल्ली निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव कपल्या गेल्याच्या मुद्दावरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "तुघलकाबाद येथील बूथवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मतदारांची नावे कापवली आहेत." यावर सभागृह नेते जेपी नड्डा म्हणाले, "ज्यांची नावे काढली जात आहेत, ते बांगलादेशी-रोहिंग्या तर नाहीत ना, ही बघण्यासारखी गोष्ट आहे." यानंतर संजय सिंह यांनी, "राम सिंह यांच्यासह अनेक मतदारांची नावे वाचून दाखवली आणि पूर्वांचली बांधवांना रोहिंग्या-बांगलादेशी म्हणण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?" असा सवालही केला. 

"आमचे पूर्वांचली बांधव कष्ट करतात, घाम गाळतात. ते यांचे डिपॉझिट जप्त करतील. त्यांना घोटाळ्यातून निवडणूक जिंकायची आहे. मात्र ही चाल दिल्लीत चालणार नाही. त्यांना निवडणूक निपटवायची आहे. निवडणुकीतच गडबड केली तर संविधान कसे वाचणार?" असा प्रश्नही संजय सिंह यांनी केला.

मशिदींमधील सर्वेक्षणावरूनही साधला निशाणा -देशातील मशिदींमधील सर्वेक्षणासंदर्भात बोलताना आम आदमी पार्टी नेते संजय सिंह म्हणाले, "आम्ही लोक देवाच्या दर्शनासाठी अयोध्या-काशी येथे जातो. मात्र, भाजपच्या लोकांना जेव्हा दर्शन करायचे असते, तेव्हा ते, मशिदीत जातात. हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत."

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा