शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 20:11 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील प्रचार सभेतून पाकिस्तानला सुनावले.

Rajnath Singh in Jammu-Kashmir : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी(दि.8) निवडणूक प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये पोहोचले. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत भारत कधीही दहशतवाद सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. पाकिस्ताननेजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण ठेवले, तर भारत चर्चा करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा!

भाजपचे उमेदवार मोहम्मद सलीम भट यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह रामबन जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा उद्देश जम्मू-काश्मीरमधील लोकांचे दुःख संपवणे आणि हा प्रदेश समृद्ध करणे हा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया मान्य करणार नाही. काही लोक पाकिस्तानशी चर्चा करण्याचे सल्ले दत आहेत. शेजाऱ्यांशी चांगले संबंध कुणाला नको आहेत? पण, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

...तर PoKवालेही भारतात जायचे म्हणतील

राजनाथ सिंह पुढे म्हणतात, काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य झाल्या आहेत. या दहशतवादी घटनांमध्ये बळी पडलेल्यांपैकी 85 टक्के मुस्लिम समाजाचे लोक आहेत. राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतात सामील होण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला आमचे समजतो, पण पाकिस्तान तुम्हाला परदेशी समजतो. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. भाजपला मत द्या, जेणेकरून आम्ही या प्रदेशात सर्वांगीण विकास करू शकू. राज्यातील विकास पाहून पीओकेमधील लोक भारतात जायचे आहे, असे म्हणतील.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानBJPभाजपा