शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 20:11 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील प्रचार सभेतून पाकिस्तानला सुनावले.

Rajnath Singh in Jammu-Kashmir : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी(दि.8) निवडणूक प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये पोहोचले. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत भारत कधीही दहशतवाद सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. पाकिस्ताननेजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण ठेवले, तर भारत चर्चा करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा!

भाजपचे उमेदवार मोहम्मद सलीम भट यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह रामबन जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा उद्देश जम्मू-काश्मीरमधील लोकांचे दुःख संपवणे आणि हा प्रदेश समृद्ध करणे हा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया मान्य करणार नाही. काही लोक पाकिस्तानशी चर्चा करण्याचे सल्ले दत आहेत. शेजाऱ्यांशी चांगले संबंध कुणाला नको आहेत? पण, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

...तर PoKवालेही भारतात जायचे म्हणतील

राजनाथ सिंह पुढे म्हणतात, काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य झाल्या आहेत. या दहशतवादी घटनांमध्ये बळी पडलेल्यांपैकी 85 टक्के मुस्लिम समाजाचे लोक आहेत. राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतात सामील होण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला आमचे समजतो, पण पाकिस्तान तुम्हाला परदेशी समजतो. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. भाजपला मत द्या, जेणेकरून आम्ही या प्रदेशात सर्वांगीण विकास करू शकू. राज्यातील विकास पाहून पीओकेमधील लोक भारतात जायचे आहे, असे म्हणतील.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानBJPभाजपा