शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

राजस्थान, तेलंगणात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शुक्रवारी मतदान; मंगळवारी निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:30 IST

राजस्थान व तेलंगणातील प्रचाराच्या तोफा बुधवारी संध्याकाळी थंडावल्या.

नवी दिल्ली : राजस्थान व तेलंगणातील प्रचाराच्या तोफा बुधवारी संध्याकाळी थंडावल्या. या दोन्ही राज्यांमध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी या दोन तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश व मिझोराम अशा पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागतील. यापैकी राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये आतापर्यंत भाजपाचे सरकार होते. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीचे तर मिझोराममध्ये लाल थनहवला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते.आता मतदार काय कौल देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत प्रामुख्याने भाजपा व काँग्रेस यांच्यामध्ये लढती होणार आहेत. त्यापैकी राजस्थानमध्ये भाजपाची स्थिती चांगली नाही, असे मतदार चाचण्यांचे निष्कर्ष असले तरी तिथे त्या पक्षाने जोरदार प्रचार केला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते, मंत्री तसेच काही योगी आदित्यनाथ यांनी तिथेप्रचार केला. राजस्थान कसेहीकरून टिकवायचेच, असा भाजपाचा प्रयत्न आहे. दुसरीकडे किमानएखाद दोन राज्ये आपल्या ताब्यात यावीत, या दृष्टीने काँग्रेसने प्रचार केला.आम्हाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तिन्ही राज्यांत कसबसे का होईना, बहुमत मिळेल, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. तेलंगणात टीआरएस आणि काँग्रेसप्रणीत तेलगू देसम, टीजेएस व सीपीआय यांच्या आघाडीतच सामने होतील. तिथे भाजपा नाममात्र असेल, असे चित्र आहे. मिझोराममध्ये काँग्रेस व मिझो नॅशनल फ्रंट अशाच लढती होतील. तिथे भाजपा प्रचारापुरतीच आहे. पण निकालांनंतर पुन्हा काँग्रेसचे सरकार येऊ नये, यासाठी भाजपा सर्व प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी राजस्थानात सभा घेतल्या, तर राहुल गांधी यांनी तेलंगणाचा दौरा केला. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ तेलंगणाच्या विविध भागांत आज दाखवण्यात आला. राजस्थानात भाजपाने संपूर्ण काळात २२२ मोठ्या प्रचारसभा घेतल्या आणि १५ ठिकाणी रोड शो केले. या दोनच नव्हे, तर पाचही राज्यांत कोणाला यश मिळते, हे ११ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. मतदान शुक्रवारी संध्याकाळी संपल्यानंतर या पाचही राज्यांत मतदारांचा कौल काय होता, हे दाखवण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यात येतील. त्यांचेही अंदाजही कितपत खरे ठरतात, हेही ११ डिसेंबरलाच कळेल.