शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

राजीव सरकार उलथवण्याचा होता लष्कराचा कट!

By admin | Published: October 05, 2015 3:52 AM

राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता

चंदीगड : राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला(त्यात पश्चिम कमांडचाही सहभाग होता) दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता, असा खळबळजनक दावा लष्कराच्या पश्चिम कमांडचे माजी कमांडर लेप्ट. जन. पी.एन. हून यांनी केला आहे.तत्कालीन लष्करप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी व उपलष्करप्रमुख लेप्ट. जन. एस.एफ. रॉड्रिग्ज यांचाही या कटात सहभाग होता, असेही ८६वर्षीय हून यांनी नुकत्याच प्रकाशित ‘द अनटोल्ड ट्रुथ’ या पुस्तकात नमूद केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजीव गांधी यांच्याशी सख्य नसलेल्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी हा कट रचताना लष्कराला हाताशी धरले होते. १९८७मध्ये पंजाबचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर रे यांनी चंदीगडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्यानी झैलसिंग यांनी राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचा तसेच त्यांना १९८४च्या शीख दंगलीतील पीडितांची चिंता नसल्याचा आरोप केला होता.हून हे वेस्टर्न कमांडचे प्रमुख असताना मे-जून १९८७मध्ये कार्यालयीन कामासाठी दिल्लीत गेले असता त्यांना बटालियन मूव्ह करण्याबाबत संदेश मिळाला होता. लष्कराच्या मुख्यालयाला तीन पॅरा-कमांडो बटालियन हलविण्याबाबत पत्र पाठविण्यात आल्याची माहिती त्यात होती. पश्चिम कमांडच्या अंतर्गत असलेली पहिली तसेच उत्तर आणि दक्षिण कमांडच्या नवव्या आणि दहाव्या बटालियनला दिल्लीत कूच करण्याचा तो आदेश होता. विशेष दलांची मागणी करण्यात आल्याबाबत मी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे प्रधान सचिव गोपी अरोरा यांना घडामोडींची माहिती दिली. या बटालियन रॉड्रिग्ज यांच्या नियंत्रणाखाली ठेवल्या जाणार होत्या. देशासाठीच नव्हे तर राजकीय यंत्रणेला हादरा देणारा असा हा आदेश असल्याची कल्पना मला होती. मी त्यावेळी दिल्ली एरिया कमांडरला माझ्या आदेशाखेरीज सैन्य हलवू नका, असा आदेश देत ही मोहीम यशस्वी होऊ दिली नाही, असा दावाही हून यांनी या पुस्तकात केला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)———————————————-लष्करी राजवटीची भीतीहून हे आॅक्टोबर १९८७ मध्ये निवृत्त झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री विद्याचरण शुक्ला यांंना लष्कराच्या हालचालींची माहिती होती, असे हून यांनी त्यांच्या पुस्तकात ‘ ग्यानी झैलसिंग विरुद्ध राजीव गांधी’ या दहाव्या प्रकरणात म्हटले आहे. त्यावेळी शुक्ला हे चांदमिनार येथे खास माझी भेट घेण्यासाठी आले होते. राजीव गांधी यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यास लष्कराच्या हाती सत्ता सोपविली जाण्याची भीती तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना होती, असेही हून यांनी म्हटले. अनेक युद्धांत सहभागाचा अनुभव असलेले ९४ वर्षीय एअर मार्शल रणधीरसिंग यांनी मात्र हून यांच्या दाव्याला छेद दिला आहे. लष्करी उठावाचा कोणताही प्रयत्न कधीही झाला नाही. भारतीय जवानांना दिले जात असलेले पारंपरिक प्रशिक्षण त्या स्वरूपाचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.