शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्व. राजीव गांधी यांच्या ‘भारतरत्न’वरून आपमध्ये वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 05:37 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा किताब काढून घेण्यात यावा, असे वाक्य घालण्यात आल्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार अडचणीत आले आहे.

नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींना नरसंहार ठरवून, गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, यासाठीच्या प्रस्तावात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा किताब काढून घेण्यात यावा, असे वाक्य घालण्यात आल्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार अडचणीत आले असून, आम आदमी पक्षातही फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.या ठरावावरील चर्चेत भाग घेताना स्व. राजीव गांधी यांचा भारतरत्न किताब काढून घ्यावा, अशी मागणी करावी, असे आपणास सांगण्यात आले होते. ते आपणास मान्य नव्हते. त्यामुळे चर्चेत भाग न घेता, आपण सभागृहातून निघून गेलो. त्यानंतर आपण आमदारकीचा व आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असे आपणास अरविंद केजरीवाल यांच्याकडून कळविण्यात आले, असा आरोप आ. अलका लांबा यांनी टिष्ट्वटरवरून केला. मात्र, अलका लांबा यांना राजीनामा देण्यास कोणीही सांगितलेले नाही, असा दावा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.त्यानंतर आपण स्वत:हून राजीनामा देणार असल्याचे अलका लांबा यांनी स्पष्ट केले. अलका लांबा पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. दिल्लीतील विधानसभा निवडणुकांआधी त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. चांदणी चौक मतदारसंघातून निवडून आलेल्या अलका लांबा या दिल्लीत विद्यार्थी नेत्या म्हणूनही ओळखल्या जात.मात्र, मुद्दा अलका लांबा यांच्या राजीनाम्यापुरता नसून, राजीव गांधी यांना दिलेला भारतरत्न हा किताब मागे घेण्याची मागणीही वादात सापडली आहे. तो किताब मागे घेण्याच्या मुद्यासह प्रस्ताव मागे झाला असल्याचे आपचे काही आमदार जाहीरपणे सांगत आहेत. मात्र, संमत झालेल्या प्रस्तावात राजीव गांधी वा भारतरत्न हा उल्लेख नाही, असे विधानसभाध्यक्षांनी नंतर म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनीही तोच दावा केला.आ. सोमनाथ भारती यांनी राजीव गांधी यांचा किताब मागे घेण्याच्या मागणीची ओळ मूळ प्रस्तावाला जोडली होती. ती मंजूर झालेली नाही, असे ते म्हणाले. मात्र टंकलिखित प्रस्तावातच तो उल्लेख आहे, असे सांगण्यात आले.या प्रस्तावाला भाजपानेही पाठिंबा दिला होता. मूळ प्रस्तावात बदल केल्याबद्दल सोमनाथ भारती यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आपचे काही नेते खासगीत सांगत आहेत; पण भारती वा लांबा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यतानाही.तणाव वाढलाया वादामुळे आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यातील वाद मात्र पुन्हा उफाळला आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या सर्व विरोधकांच्या बैठकीला अरविंद केजरीवाल उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली होती.केजरीवाल यांच्या उपस्थितीमुळे आप व काँग्रेस एका व्यासपीठावर दिसणार, अशी चर्चा सुरू झाली होती; पण आपमधील वरील वादानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, अजय माकन या नेत्यांनी आप व केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र चालवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव वाढला आहे.

टॅग्स :AAPआप