शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राजीव गांधींनी नौदलाचे जहाज कुटुंबाला फिरण्यासाठी वापरले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:31 IST

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांचे नाव घेऊन काँग्रेसला लक्ष्य केले.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांचे नाव घेऊन काँग्रेसला लक्ष्य केले. येथील रामलीला मैदानावर बुधवारी मोदी यांनी प्रचारसभेत म्हटले की, आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ते म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. २०१४ च्या आधीची परिस्थिती आठवून बघा त्यावेळी लोकांना भीती असायची की कुठे काही होतेय का? परंतु, आता देश बदलला आहे.’घराणेशाहीच्या राजकारणावरून मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसचे नामदार काँग्रेसच्या चौथ्या पिढीला बघत आहेत. परंतु, वंशवादी मानसिकतेला फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित ठेवले गेले नाही तर या कुटुंबाच्या जवळच्या सगळ््या लोकांनी घराणेशाहीचा झेंडा पुढे नेला आहे.मोदी म्हणाले, दिल्लीत शीला दीक्षित, हरियाणात हुड्डा, भजनलाल, बन्सीलाल आणि लालू यांचे घराणे आहे. पंजाबमध्ये बेअंत सिंग यांचे कुटुंब, राजस्थानात गहलोत आणि पायलट, मध्य प्रदेशात शिंदे, कमलनाथ यांचे कुटुंब आणि दिग्विजय सिंह यांचे कुटुंब वंशवाद बळकट करीत आहे.नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरही टीका केली. केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या आंदोलनाला निष्फळ ठरवले व नंतर जो विडा उचलला त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले, असे ते म्हणाले. दिल्लीतील सर्व सातही मतदारसंघांसाठी मोदी यांची ही एकमेव सभा ठेवली गेली होती. १२ मे रोजी या मतदारसंघांत मतदान होणार असून दिल्लीकरांना त्यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019