शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजीव गांधी हत्याकांड! दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 21:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्याकांडातील आरोपींची सुटका केली आहे.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींना सोडण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सरकारने नलिनीसह सहा दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनीसह सहा दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

राजीव गांधी हत्येप्रकरणी नलिनी आणि पी रविचंद्रन यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नलिनी, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यापूर्वी 18 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील आणखी एका दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य केले की पेरारिवलन प्रकरणातील SC चा निर्णय उर्वरित 6 दोषींनाही लागू होतो.

काँग्रेसने निर्णयाला चुकीचे म्हटले राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेला काँग्रेसने दुर्दैवी आणि चुकीचे म्हटले. दोषींना सोडले जाऊ नये असे काँग्रेसने म्हटले होते. ही हत्या माजी पंतप्रधानांशी संबंधित आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीशी संबंधित नाही, असे काँग्रेसने म्हटले. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषींना सोडण्याच्या मुद्द्यावर मला यात कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. पेरारिवलनच्या सुटकेवर राहुल यांनी हे वक्तव्य केले.

नलिनीला भेटल्यावर प्रियांका रडत होतीसुप्रीम कोर्टातून सुटका झाल्यानंतर दोषींपैकी एक असलेल्या नलिनीने सरकारचे आभार मानले. तमिळनाडूच्या जनतेचेही तिने आभार मानले. काँग्रेस नेत्या आणि राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधीही 2008 मध्ये तुरुंगात नलिनी यांना भेटायला गेल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनीने सांगितले की, प्रियंका तिच्यासमोर रडत होत्या. नलिनीने राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित सर्व गोष्टी प्रियांकाला सांगितल्या होत्या.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय