शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

राजीव गांधी हत्याकांड! दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 21:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्याकांडातील आरोपींची सुटका केली आहे.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींना सोडण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सरकारने नलिनीसह सहा दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनीसह सहा दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

राजीव गांधी हत्येप्रकरणी नलिनी आणि पी रविचंद्रन यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नलिनी, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यापूर्वी 18 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील आणखी एका दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य केले की पेरारिवलन प्रकरणातील SC चा निर्णय उर्वरित 6 दोषींनाही लागू होतो.

काँग्रेसने निर्णयाला चुकीचे म्हटले राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेला काँग्रेसने दुर्दैवी आणि चुकीचे म्हटले. दोषींना सोडले जाऊ नये असे काँग्रेसने म्हटले होते. ही हत्या माजी पंतप्रधानांशी संबंधित आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीशी संबंधित नाही, असे काँग्रेसने म्हटले. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषींना सोडण्याच्या मुद्द्यावर मला यात कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. पेरारिवलनच्या सुटकेवर राहुल यांनी हे वक्तव्य केले.

नलिनीला भेटल्यावर प्रियांका रडत होतीसुप्रीम कोर्टातून सुटका झाल्यानंतर दोषींपैकी एक असलेल्या नलिनीने सरकारचे आभार मानले. तमिळनाडूच्या जनतेचेही तिने आभार मानले. काँग्रेस नेत्या आणि राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधीही 2008 मध्ये तुरुंगात नलिनी यांना भेटायला गेल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनीने सांगितले की, प्रियंका तिच्यासमोर रडत होत्या. नलिनीने राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित सर्व गोष्टी प्रियांकाला सांगितल्या होत्या.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय