शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

लोकसभा निवडणुकीसाठी रजनीकांत यांची मोठी घोषणा; दिला हा इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 11:31 IST

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती.

चेन्नई : शिवाजी राव गायकवाड अर्थात दक्षिणेतील महाअभिनेता रजनीकांत यांनी आज लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मोठी घोषणा केली आहे. यामुळे त्यांचे चाहते. कार्यकर्ते नाराज झाले आहेत. 

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती. मात्र, त्यांनी स्वत:चा पक्ष काढण्याचे ठरविले होते. यामुळे रजनीकांत लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चाही जोर धरत होती. मात्र, रजनीकांत यांनी आज त्यावर पडदा टाकत राजकीय फुग्यातील हवाच काढून घेतली आहे. 

आपला पक्ष किंवा आपण येती लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये असेही त्यांनी बजावले आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले असून दक्षिणेतील रजनीकांत नावाचे वादळ यंदाच्या लोकसभा निवडणुकीततरी शांतच असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

रजनीकांत यांनी म्हटले की, आपला पक्ष कोणत्याही इतर पक्षाला पाठिंबा किंवा मदत करणार नाही. यामुळे कोणीही आपल्या पक्षाचा झेंडा, फोटो किंवा अन्य तपशील वापरू नये. तसेच रजनी मक्कल मंद्रम किंवा रजनी फॅन क्लब अशी नावेही वापरू नयेत. तसेच तामिळनाडूला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे जो पक्ष त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला लोकांचा पाठिंबा मिळेल. 

 

टॅग्स :rajinikanthरजनीकांतChennaiचेन्नईPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९