शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रजनीकांत हे अशिक्षित, माध्यमांनीच त्यांना केलं मोठं - भाजपा नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 15:55 IST

रजनीकांत यांनी त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असून सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली पैसे आणि जमिनी बळकावत आहेत....

नवी दिल्ली - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची त्यांनी आज चेन्नईत स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सिनेजगतासह सर्वच ठिकाणाहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पण भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र रजनीकांत यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. रजनिकांत हे अशिक्षित असून त्यांना फक्त माध्यमांनीच मोठं केलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच तामिळनाडूची जनता चाणाक्ष असून, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असेही स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रजनीकांत यांनी स्वामी यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असून सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली पैसे आणि जमिनी बळकावत आहेत. हीच परिस्थिती बदलत तामिळनाडूच्या राजकीय व्यवस्थेत आपल्याला काही महत्त्वाचे बदल घडवून आणायचे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

रजनीकांत यांनी आज आपल्या राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. ते लवकरच आपल्या पक्षाचं नावही जाहीर करणार आहेत. रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही रजिनकांत यांचं अभिनंदन केलं.  

तामिळनाडूमधील भाजपाला आपली स्थिती माहित आहे. जर भाजपा तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांच्या पक्षासोबत युती करणार असेल तर पक्षाच्या बैठकीमध्ये मी त्याला विरोध करणार असल्याचे ट्विटही स्वामी यांनी केलं आहे.

 

नाताळानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या मेळाव्यात रजनीकांत म्हणाले होते की, राजकारणातील अडचणी मला माहीत आहेत. मला त्यांची कल्पना नसती तर मी राजकारणात यापूर्वीच उडी घेतली असती. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीही लागते. याआधी आपण सन 1996मध्ये द्रमुकला मते देऊन जयललिता यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले होते. त्याचा संदर्भ देत रजनीकांत म्हणाले, खरेतर मी त्याच वेळी राजकारणात उतरलो होतो. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही. 

टॅग्स :rajinikanthरजनीकांतSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी