शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:22 IST

Rajinikanth : रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

ठळक मुद्देरजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारला. मात्र, राजधानी दिल्लीतील या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती होती.

चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर, दोन-तीन दिवसांतच रजनीकांत यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीचे हेल्थ बुलेटीन आले असून काळजी करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी, डॉक्टरांनी कार्टोइड आर्टरी रिवास्कुलराइजेशन करण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे, चाहत्यांनाही दिसाला मिळाला आहे. 

दरम्यान, रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारला. मात्र, राजधानी दिल्लीतील या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे, रजनीकांत यांनी या दोन्ही प्रमुखांची भेट घेतली. रजनीकांतने ट्विटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभेच्छा मिळाल्याने आनंद झाल्याचे म्हटले.

रजनीकांत यांच्यासोबत या भेटीत त्यांच्या पत्नी लता रजनीकांत ह्याही उपस्थित होत्या. दरम्यान, रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार आपले गुरू दिवंगत चित्रपट निर्माते बालाचंदर यांच्यासह अनेकांना समर्पित केला आहे. रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आपण राजकारणात येणार नसल्याचं रजनीकांतने सांगितले.  

टॅग्स :rajinikanthरजनीकांतhospitalहॉस्पिटलChennaiचेन्नई