शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

'तरुणीपुढे रेल्वे झुकली, एकटीसाठी रांचीपर्यंत राजधानी धावली'; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 20:20 IST

राजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण 930 प्रवासी होते. त्यांना ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्याने बसने पाठविण्यात आले. मात्र, यावेळी एका अनन्या नावाच्या तरुणीने बसने पुढे जाण्यास नकार दिला.

रांची : झारखंडच्या टाना भगतांच्या आदोलनामुळे दिल्ली-रांची रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी दिल्लीहून रांचीला जाणारी राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना 9 तासांनी बसने रांचीला पाठविण्यात आले. या दरम्यान एका महिलेने बसने जाण्यास नकार दिल्याचे वृत्त पसरले होते. ती महिला ट्रेननेच रांचीला जाणार असल्याच्या मागणीवर ठाम राहिली आणि त्या महिलेसाठी रेल्वेने राजधानी एक्सप्रेस सोडल्याचे हे वृत्त अखेर खोटे ठरले. 

धनबाद झोनचे वरिष्ठ डीसीएम एके पांडे यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. ट्रेनला डीटीओमध्ये आणण्यात आले होते, मात्र कोणतेही सकारात्मक संकेत न दिसल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व प्रवाशांना बसने रांचीला रवाना केले. कोणत्याही प्रवाशासाठी पुढे ट्रेन गेली नाही. आधीच्या वृत्तानुसार राजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण 930 प्रवासी होते. त्यांना ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्याने बसने पाठविण्यात आले. मात्र, यावेळी एका अनन्या नावाच्या तरुणीने बसने पुढे जाण्यास नकार दिला. अनन्या मुलसरायहून ट्रेनमध्ये बसली होती. तिला रांचीला जायचे होते. ती वारानसीला लॉ शिकत आहे. 

'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको

अनन्या हट्टा पेटल्याने तिला रेल्वे अधिकारी, सह प्रवाशांनी एकटीसाठी ट्रेन जाऊ शकत नसल्याचे समजावले परंतू तिने पुढे जाण्यास नकार दिला. प्रवाशाला त्याच्या इच्छित स्थानकावर सोडण्याचा रेल्वेची जबाबदारी आहे, त्यामुळे मी बसने जाणार नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर ही गोष्ट दिल्लीतील मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेली आणि त्यांनी त्या मुलीसाठी ट्रेन चालविण्याचे आदेश दिले.

 

दिल्ली रांची मार्ग बंद असल्याने ही ट्रेन गया येथे पाठविण्यात आली. तिथून ती गोमो आणि बोकारोहून रांचीला पोहोचली, असे या वृत्तामध्ये म्हटले होते. ही ट्रेन रात्री 1.45 वाजता पोहोचली. या ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचारी आणि केवळ अनन्याच होती. तिच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवानही होता. रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल असे म्हटले होते. ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती. अखेर ती फेक निघाली. 

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेFake Newsफेक न्यूज