शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

14 वर्षीय 'जलपरी'चा विक्रम! 9 तासांत पार केलं 47 कि.मीचे अंतर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 10:04 IST

14 वर्षीय जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे 47 किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले.

मुंबई - राजस्थानच्या एका 14 वर्षीय मुलीनं सलग 47 तास पोहत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राजस्थानमधील उदयपूरस्थित 14 वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे 47 किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे 3.30 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी 1: 32 वाजता पोहोचली. हे 47 किलोमीटरचे अंतर नऊ तास आणि 23 मिनीटांमध्ये यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला.

जुहू ते गेटवे हे अंतर आजवर कोणत्याही जलतरणपटूने पोहून पार केलेले नाही. गेटवे ऑफ इंडियाला गौरवीचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी तिचे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन दिले. यावेळी गेटवे ऑफ इंडियाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित राहून तिचे स्वागत केले. तर, या विक्रमात आई-वडील, आजी, प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे गौरवीने सांगितले. 

गौरवी सिंघवीच्या या रेकॉर्डचे साक्षीदार होण्यासाठी कोस्ट गार्डच्या टीमसह कोच महेश पालीवाल आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.  समुद्रा खवळला असतानाही गौरवीनं हा मोठा पल्ला सहजासहजी पार केला.  यावेळी गौरवीच्या सुरक्षेसाठी लाइफगार्ड आणि दोन बोटी तयार होत्या. गेल्यावर्षी मार्च महिन्यात गौरवीनं बांद्रा-वर्ळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे अंतर पार केलं होतं.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गौरवीनं पोहायला सुरुवात केली होती. गौरवीच्या आई(शुभ सिंघवी )तिला सुरुवातीला ट्रेनिंग दिले होतं.  उदयपूरातील फतहसागर तलावामध्ये गौरवी दरदोज 8 ते 10 तास पोहण्याचा सराव करत असे. सराव करताना ती नाश्ता करने किंवा पाणी पिणे हे सर्व ती पाण्यातच करत असे.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, देशातील खुल्या समुद्रातील सर्वांत जास्त अंतर गौरवीने पार केले आहे. हा जागतिक विक्रम म्हणायला हरकत नाही. तिने हा विक्रम 9तासांत केला आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांतर्फे तिच्या अभिनंदनासाठी आलो होतो, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या देशातल्या शालेय मुलीने विक्रम प्रस्थापित केल्याचा अभिमान असल्याचेही ते या वेळी म्हणाले.