शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:36 IST

राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे.

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. ती न मिळाल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांची समजूत घालण्यात नेत्यांचा वेळ जात आहे. जयपूर, कोटा, बिकानेर व भरतपूरमध्ये नाराज नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले तर काहींनी राजीनामासत्र सुरू केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या नेत्यांना नाराजांची मनधरणी करावी लागत आहे.काँग्रसने पहिल्या यादीत ४६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, एकूण २३ जाट, १३ राजपूत, २९ एससी आणि २४ एसटी उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट टोंकमधून, तर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून निवडणूक लढत आहेत. मात्र, आयात नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेला बगल देत राजस्थानात सहा आयारामांना संधी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले हबीब उर रहमान यांना नागौर, खा. हरीश मीणा यांना देवळी-उनियारा, कन्हैयालाल झंवर यांना बीकानेर पूर्व, तर सोनादेवी बावरी यांना रायसिंह नगरमधून उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले राजकुमार यांना नवलगड, माजी आयपीएस अधिकारी सवाई सिंह गोदारा यांना खिंवसरमधून तिकिट दिले आहे.जयपूरमधील किसनपोलमधून अमीन कागजी यांना संधी दिल्याने माजी महापौर व काँग्रेसच्या महासचिव ज्योती खंडेलवाल यांनी राजीनामा दिला आहे. विद्याधर नगरमधून दोनदा निवडणूक लढवलेल्या विक्रम सिंह यांना तिकिट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयपूर पक्ष कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. विक्रम सिंह अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. माजी खासदार ब्रह्मदेव कुमावत यांनीही बंड करीत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. जैसलमेरमधून माजी आमदार सुनिता भाटी, डुंगरपूरमधून तिकीट नाकारलेले महेंद्र बरजोड काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या २00 हून अधिक पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. सर्वेक्षणांत काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी बंडखोरीमुळे पक्षाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.रेल्वे रोखल्या, खुर्च्या जाळल्याराजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. डी. कल्ला यांना बिकानेरमधून तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केला आणि काँग्रेस कार्यालयातील खुर्च्याही जाळल्या. जयपूर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. बस्सीमधून तिकीट न मिळाल्याने लक्ष्मण मीणा यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दक्षिण कोटाची उमेदवारी न मिळाल्याने राखी गौतम यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. दोनदा काँग्रेसशी बंडखोरी करून परत काँग्रेसमध्ये परतलेल्या पृथ्वीराज मीणायांना उमेदवारी न मिळाल्याने तेही नाराज आहेत.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस