शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
4
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
5
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
6
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
7
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
8
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
9
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
10
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
11
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
12
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
13
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
14
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
15
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
16
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
17
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
18
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
19
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
20
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:36 IST

राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे.

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. ती न मिळाल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांची समजूत घालण्यात नेत्यांचा वेळ जात आहे. जयपूर, कोटा, बिकानेर व भरतपूरमध्ये नाराज नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले तर काहींनी राजीनामासत्र सुरू केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या नेत्यांना नाराजांची मनधरणी करावी लागत आहे.काँग्रसने पहिल्या यादीत ४६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, एकूण २३ जाट, १३ राजपूत, २९ एससी आणि २४ एसटी उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट टोंकमधून, तर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून निवडणूक लढत आहेत. मात्र, आयात नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेला बगल देत राजस्थानात सहा आयारामांना संधी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले हबीब उर रहमान यांना नागौर, खा. हरीश मीणा यांना देवळी-उनियारा, कन्हैयालाल झंवर यांना बीकानेर पूर्व, तर सोनादेवी बावरी यांना रायसिंह नगरमधून उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले राजकुमार यांना नवलगड, माजी आयपीएस अधिकारी सवाई सिंह गोदारा यांना खिंवसरमधून तिकिट दिले आहे.जयपूरमधील किसनपोलमधून अमीन कागजी यांना संधी दिल्याने माजी महापौर व काँग्रेसच्या महासचिव ज्योती खंडेलवाल यांनी राजीनामा दिला आहे. विद्याधर नगरमधून दोनदा निवडणूक लढवलेल्या विक्रम सिंह यांना तिकिट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयपूर पक्ष कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. विक्रम सिंह अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. माजी खासदार ब्रह्मदेव कुमावत यांनीही बंड करीत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. जैसलमेरमधून माजी आमदार सुनिता भाटी, डुंगरपूरमधून तिकीट नाकारलेले महेंद्र बरजोड काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या २00 हून अधिक पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. सर्वेक्षणांत काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी बंडखोरीमुळे पक्षाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.रेल्वे रोखल्या, खुर्च्या जाळल्याराजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. डी. कल्ला यांना बिकानेरमधून तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केला आणि काँग्रेस कार्यालयातील खुर्च्याही जाळल्या. जयपूर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. बस्सीमधून तिकीट न मिळाल्याने लक्ष्मण मीणा यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दक्षिण कोटाची उमेदवारी न मिळाल्याने राखी गौतम यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. दोनदा काँग्रेसशी बंडखोरी करून परत काँग्रेसमध्ये परतलेल्या पृथ्वीराज मीणायांना उमेदवारी न मिळाल्याने तेही नाराज आहेत.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस