शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ; जोधपूरमध्ये 12 तासांत 3 वेळा हिंसाचार; अनंतनागमध्ये दगडफेक, खरगोनमध्ये कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:36 IST

ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जोधपूर येथे लाउडस्पीकरच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. आता येथे पुन्हा एकदा दोन गट समोरासमोर आले आहेत. ईदच्या नमाजदरम्यान हा वाद पेटल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलिसांना येथे पुन्हा एकदा लाठीचार्ज करावा लागला आणि आश्रूधुराचे गोळेही सोडावे लागले. याशिवाय, मंगळवारी अनंतनाग येथेही मशिदीबाहेर दगडफेक झाली. ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डझनावर वाहनांचे नुकसान -सांगण्यात येते, की येथे पुन्हा एकदा पोलिसांनी फ्लॅग मार्च सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आज ईदच्या नमाज वेळी येथे मोठी गर्दी होती. याच वेळी वाद पेटला. धुडगूस घालणाऱ्या  लोकांनी जवळपास डझनावर वाहनांचे नुकसान केले आहे. या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. याशिवाय पोलिसांच्याही चार वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजप आमदार सूर्यकांता व्यास यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी येथे ठिय्या दिला आहे.

यापूर्वी, सोमवारी रात्री उशिरा जोधपूर येथील जालोरी गेट चौकात दोन्ही गटात लाऊडस्पीकर आणि झेंडे हटविण्याच्या मुद्द्यावरून दगडफेक झाली होती. आताही त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, येथे एका समुदायातील लोकांनी, जालोरी भागातील, स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावरील झेंड्यावर आक्षेप घेतला. तसेच हा झेंडा आणि ईदनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरविरोधात घोषणाबाजी केली.

याच बरोबर या आंदोलकांनी हा झेंडा आणि बॅनर काढून टाकले. यामुळे वाद वाढला. यानंतर दुसऱ्या समाजाचे लोक नाराज झाले आणि नंतर दोन्ही गटांत दगडफेक सुरू झाली. यानंतर, जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी एक वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश