शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ; जोधपूरमध्ये 12 तासांत 3 वेळा हिंसाचार; अनंतनागमध्ये दगडफेक, खरगोनमध्ये कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:36 IST

ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जोधपूर येथे लाउडस्पीकरच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. आता येथे पुन्हा एकदा दोन गट समोरासमोर आले आहेत. ईदच्या नमाजदरम्यान हा वाद पेटल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलिसांना येथे पुन्हा एकदा लाठीचार्ज करावा लागला आणि आश्रूधुराचे गोळेही सोडावे लागले. याशिवाय, मंगळवारी अनंतनाग येथेही मशिदीबाहेर दगडफेक झाली. ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डझनावर वाहनांचे नुकसान -सांगण्यात येते, की येथे पुन्हा एकदा पोलिसांनी फ्लॅग मार्च सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आज ईदच्या नमाज वेळी येथे मोठी गर्दी होती. याच वेळी वाद पेटला. धुडगूस घालणाऱ्या  लोकांनी जवळपास डझनावर वाहनांचे नुकसान केले आहे. या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. याशिवाय पोलिसांच्याही चार वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजप आमदार सूर्यकांता व्यास यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी येथे ठिय्या दिला आहे.

यापूर्वी, सोमवारी रात्री उशिरा जोधपूर येथील जालोरी गेट चौकात दोन्ही गटात लाऊडस्पीकर आणि झेंडे हटविण्याच्या मुद्द्यावरून दगडफेक झाली होती. आताही त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, येथे एका समुदायातील लोकांनी, जालोरी भागातील, स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावरील झेंड्यावर आक्षेप घेतला. तसेच हा झेंडा आणि ईदनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरविरोधात घोषणाबाजी केली.

याच बरोबर या आंदोलकांनी हा झेंडा आणि बॅनर काढून टाकले. यामुळे वाद वाढला. यानंतर दुसऱ्या समाजाचे लोक नाराज झाले आणि नंतर दोन्ही गटांत दगडफेक सुरू झाली. यानंतर, जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी एक वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश