शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:47 IST

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले.

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. त्यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिका हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. माझे पप्पा खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केलं आहे. मी रात्री ९ वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत."

"पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन." रविवारी शहीद सुरेंद्र मोगा यांचं पार्थिव झुंझुनू येथील मांडवा येथे पोहोचलं. मांडवा शहरातील बिसाऊ क्रॉसिंगवरून त्यांचे पार्थिव मेहरादासी गावात आणलं. यावेळी  मोठ्या संख्येने तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

सुरेंद्र मोगा यांचे वडीलही होते सैन्यात

शहीद सुरेंद्र मोगा यांचे वडीलही सैन्यात होते. तीन मोठ्या बहिणींव्यतिरिक्त, कुटुंबात सर्वात धाकटा भाऊ, ११ वर्षांची मुलगी, पत्नी आणि ७ वर्षांचा मुलगा आहे. सुरेंद्र यांची १ जानेवारी २०१० रोजी भारतीय हवाई दलात निवड झाली. त्यांनी राजस्थान पब्लिक स्कूल आणि झुनझुनू येथील जीआर पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी झुंझुनूच्या मोरारजी कॉलेजमधून बीएससी केलं. ते उधमपूर हवाई तळावर तैनात होते आणि पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले.

"पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "दहशतवाद हा कुत्र्याचं शेपूट आहे, जे कधीही सरळ होणार नाही. त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी दोनशे एकर जमीन दिली. आता येथे ब्रह्मोसचे उत्पादन सुरू होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाहिली असेल. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर पाकिस्तानी लोकांना विचारा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"

"पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे की, कोणतीही दहशतवादी घटना आता युद्ध मानली जाईल आणि लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण दहशतवाद पूर्णपणे खात्मा करत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. आता याला चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण भारत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशच्या एकत्र या मोहिमेत सामील व्हायचं आहे." 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला