शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची जात कोणती?; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, राहुल गांधींनी 'शाळा' घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:47 IST

'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?'

नवी दिल्लीः राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी पी जोशी यांच्या एका विधानानं पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जातीचा उल्लेख करून भाजपाच्या हाती आयतंच कोलीत दिलंय. जोशींचं हे विधान महागात पडू शकतं, हे ओळखून थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर लगेचच जोशींचा माफीनामा आला. 'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?', असं वादग्रस्त विधान सी पी जोशी यांनी गुरुवारी राजस्थानातील एका सभेत केलं होतं. त्यानंतर, भाजपाने हा मुद्दा उचलून धरला आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

Shocking statement by Congress leader CP Joshi ..says “ये उमा भरती किस जाति की हैं?ये मोदी किस जात का हैं? ..केवल ब्राह्मण ही हिंदू धर्म की बात कर सकता हैं..।He even goes ahead to say that they belong to “lowly castes” who should not be speaking about HinduismAppalling!!— Sambit Patra (@sambitswaraj) November 22, 2018

भाजपा आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याची सारवासारव सी पी जोशी यांनी केली. त्या भाषणाच्या व्हिडीओची लिंकही शेअर केली. परंतु, ७ डिसेंबरला मतदान असल्यानं, ताकही फुंकून पिण्याचा पवित्रा घेत, या विषयाची दखल थेट राहुल गांधींनीच घेतली. सी पी जोशी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या विचारांना, परंपरेला शोभणारं नाही. समाजातील कुठलाही वर्ग दुखावला जाईल, अशी वक्तव्यं नेत्यांनी करू नयेत. सी पी जोशी यांनीही या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी, असं ट्विटच राहुल यांनी केलं. पक्षश्रेष्ठींच्या या आदेशानंतर लगेचच सी पी जोशी यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला.

सी पी जोशी जी का बयान कांग्रेस पार्टी के आदर्शों के विपरीत है। पार्टी के नेता ऐसा कोई बयान न दें जिससे समाज के किसी भी वर्ग को दुःख पहुँचे।कांग्रेस के सिद्धांतों, कार्यकर्ताओं की भावना का आदर करते हुए जोशीजी को जरूर गलती का अहसास होगा। उन्हें अपने बयान पर खेद प्रकट करना चाहिए।— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 23, 2018

कांग्रेस के सिद्धांतो एवं कार्यकर्ताओं की भावनाओं का सम्मान करते हुए मेरे कथन से समाज के किसी वर्ग को ठेस पहुँची हो तो मैं उसके लिए खेद प्रकट करता हूँ ।— Dr. C.P. Joshi (@drcpjoshi) November 23, 2018

काँग्रेसच उभारेल राम मंदिर निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपा जनतेला फसवण्याचा प्रयत्न करतेय. हा विषय अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निकाल आला की काँग्रेसच अयोध्येत राम मंदिर उभारेल, अशी घोषणा सी पी जोशी यांनी सभेत केली होती.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी