शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मोदींची जात कोणती?; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, राहुल गांधींनी 'शाळा' घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:47 IST

'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?'

नवी दिल्लीः राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी पी जोशी यांच्या एका विधानानं पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जातीचा उल्लेख करून भाजपाच्या हाती आयतंच कोलीत दिलंय. जोशींचं हे विधान महागात पडू शकतं, हे ओळखून थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर लगेचच जोशींचा माफीनामा आला. 'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?', असं वादग्रस्त विधान सी पी जोशी यांनी गुरुवारी राजस्थानातील एका सभेत केलं होतं. त्यानंतर, भाजपाने हा मुद्दा उचलून धरला आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

Shocking statement by Congress leader CP Joshi ..says “ये उमा भरती किस जाति की हैं?ये मोदी किस जात का हैं? ..केवल ब्राह्मण ही हिंदू धर्म की बात कर सकता हैं..।He even goes ahead to say that they belong to “lowly castes” who should not be speaking about HinduismAppalling!!— Sambit Patra (@sambitswaraj) November 22, 2018

भाजपा आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याची सारवासारव सी पी जोशी यांनी केली. त्या भाषणाच्या व्हिडीओची लिंकही शेअर केली. परंतु, ७ डिसेंबरला मतदान असल्यानं, ताकही फुंकून पिण्याचा पवित्रा घेत, या विषयाची दखल थेट राहुल गांधींनीच घेतली. सी पी जोशी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या विचारांना, परंपरेला शोभणारं नाही. समाजातील कुठलाही वर्ग दुखावला जाईल, अशी वक्तव्यं नेत्यांनी करू नयेत. सी पी जोशी यांनीही या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी, असं ट्विटच राहुल यांनी केलं. पक्षश्रेष्ठींच्या या आदेशानंतर लगेचच सी पी जोशी यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला.

सी पी जोशी जी का बयान कांग्रेस पार्टी के आदर्शों के विपरीत है। पार्टी के नेता ऐसा कोई बयान न दें जिससे समाज के किसी भी वर्ग को दुःख पहुँचे।कांग्रेस के सिद्धांतों, कार्यकर्ताओं की भावना का आदर करते हुए जोशीजी को जरूर गलती का अहसास होगा। उन्हें अपने बयान पर खेद प्रकट करना चाहिए।— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 23, 2018

कांग्रेस के सिद्धांतो एवं कार्यकर्ताओं की भावनाओं का सम्मान करते हुए मेरे कथन से समाज के किसी वर्ग को ठेस पहुँची हो तो मैं उसके लिए खेद प्रकट करता हूँ ।— Dr. C.P. Joshi (@drcpjoshi) November 23, 2018

काँग्रेसच उभारेल राम मंदिर निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपा जनतेला फसवण्याचा प्रयत्न करतेय. हा विषय अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निकाल आला की काँग्रेसच अयोध्येत राम मंदिर उभारेल, अशी घोषणा सी पी जोशी यांनी सभेत केली होती.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी