शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींची जात कोणती?; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, राहुल गांधींनी 'शाळा' घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:47 IST

'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?'

नवी दिल्लीः राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी पी जोशी यांच्या एका विधानानं पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जातीचा उल्लेख करून भाजपाच्या हाती आयतंच कोलीत दिलंय. जोशींचं हे विधान महागात पडू शकतं, हे ओळखून थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर लगेचच जोशींचा माफीनामा आला. 'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?', असं वादग्रस्त विधान सी पी जोशी यांनी गुरुवारी राजस्थानातील एका सभेत केलं होतं. त्यानंतर, भाजपाने हा मुद्दा उचलून धरला आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

Shocking statement by Congress leader CP Joshi ..says “ये उमा भरती किस जाति की हैं?ये मोदी किस जात का हैं? ..केवल ब्राह्मण ही हिंदू धर्म की बात कर सकता हैं..।He even goes ahead to say that they belong to “lowly castes” who should not be speaking about HinduismAppalling!!— Sambit Patra (@sambitswaraj) November 22, 2018

भाजपा आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याची सारवासारव सी पी जोशी यांनी केली. त्या भाषणाच्या व्हिडीओची लिंकही शेअर केली. परंतु, ७ डिसेंबरला मतदान असल्यानं, ताकही फुंकून पिण्याचा पवित्रा घेत, या विषयाची दखल थेट राहुल गांधींनीच घेतली. सी पी जोशी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या विचारांना, परंपरेला शोभणारं नाही. समाजातील कुठलाही वर्ग दुखावला जाईल, अशी वक्तव्यं नेत्यांनी करू नयेत. सी पी जोशी यांनीही या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी, असं ट्विटच राहुल यांनी केलं. पक्षश्रेष्ठींच्या या आदेशानंतर लगेचच सी पी जोशी यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला.

सी पी जोशी जी का बयान कांग्रेस पार्टी के आदर्शों के विपरीत है। पार्टी के नेता ऐसा कोई बयान न दें जिससे समाज के किसी भी वर्ग को दुःख पहुँचे।कांग्रेस के सिद्धांतों, कार्यकर्ताओं की भावना का आदर करते हुए जोशीजी को जरूर गलती का अहसास होगा। उन्हें अपने बयान पर खेद प्रकट करना चाहिए।— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 23, 2018

कांग्रेस के सिद्धांतो एवं कार्यकर्ताओं की भावनाओं का सम्मान करते हुए मेरे कथन से समाज के किसी वर्ग को ठेस पहुँची हो तो मैं उसके लिए खेद प्रकट करता हूँ ।— Dr. C.P. Joshi (@drcpjoshi) November 23, 2018

काँग्रेसच उभारेल राम मंदिर निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपा जनतेला फसवण्याचा प्रयत्न करतेय. हा विषय अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निकाल आला की काँग्रेसच अयोध्येत राम मंदिर उभारेल, अशी घोषणा सी पी जोशी यांनी सभेत केली होती.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी