शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज ठाकरे यांच्या सुरक्षेविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: August 27, 2016 06:07 IST

राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. राज यांच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे केंद्राने सांगितल्यानंतर न्यायालयाने हा पवित्रा घेतला. ‘ठाकरे यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरविली आहे. यात केंद्राचा संबंध नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंगरा सेहगल यांच्या खंडपीठाने म्हटले. हा या न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेला जनहिताचा मुद्दा नाही. त्यामुळे यावर सुनावणी करू शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले. राज ठाकरे घटनात्मक पदावर नाहीत. लोकप्रतिनिधीही नाहीत. त्यामुळे सरकारने दिलेली ‘वाय श्रेणी’ची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोणाची होती याचिकामिथिलेश कुमार पांडे यांनी ही याचिका केली होती. द्वेषमूलक भाषणे करणारे वा ज्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत अशा खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.