शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशन सेंट्रल हॉलमध्ये अशक्य; मार्ग काढण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 23:53 IST

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय?

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै-आॅगस्ट महिन्यात कसे घेता येईल यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला मार्ग काढण्यात सध्या व्यस्त आहेत. यात राज्यसभेचे सभापती नायडू आणि बिर्ला यांनी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला आहे. लोकसभेचे अधिवेशन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेणे व्यवहार्य ठरणार नाही. कारण हॉलची बैठक क्षमता फक्त ५५० आहे.

सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’चे कटाक्षाने पालन करायचे असल्यामुळे सर्व ५४३ लोकसभा सदस्य सेंट्रल हॉलमध्ये बसू शकत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की, राज्यसभा आणि लोकसभा यांचे संयुक्त अधिवेशन सेंट्रल हॉलमध्ये घेतले जाते, तेव्हा तर सदस्यांना खूप दाटीवाटीने बसावे लागते व जास्तीच्या खुर्च्याही ठेवाव्या लागतात. दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी अधिवेशन व्हिडियो कॉन्फरन्सिंद्वारेही (व्हीसी) घेण्याचा विचार करीत आहेत. हे असे व्हीसीद्वारे अधिवेशन अनेक विकसित देशांमध्ये घेण्यात येत असते; परंतु असे तंत्रज्ञान हे रात्रीतून उभे करता येत नाही.

देशात भारत सरकारच्या एनआयसी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय उपलब्ध आहे; परंतु त्याची क्षमता फारच छोटी असून, ती आॅगस्ट-सप्टेंबरपर्यंत वापरणे शक्यही नाही. संसदेचे अधिवेशन २२ सप्टेंबरपूर्वी घेतले जायला हवे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्च रोजी कोरोना महामारीमुळे कमी करावे लागले होते. घटनेतील तरतुदींनुसार संसदेच्या दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असायला नको. तथापि, संसदेच्या समित्यांची बैठक होऊ शकते. कारण नऊ कॉन्फरन्स रूम्स तयार आहेत आणि विमान व रेल्वे सेवा उपलब्ध असल्यामुळे खासदार दिल्लीला येऊ शकतात.

संसद सदस्यांचा अधिवेशनात सहभाग आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन कसे करता येईल यासाठी एम. व्यंकय्या नायडू आणि ओम बिर्ला यांनी या विषयावर किमान तीन बैठका घेऊन चर्चा केली. दुसरा एक पर्याय असा विचारात घेतला जात आहे की, दोन्ही सभागृहांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या सदस्यांना एक दिवसाआड बोलावता येईल का? यासाठी पक्षांमध्ये व्यापक अशी सहमती आवश्यक असून, या कमी कालावधीच्या अधिवेशनात कोणतेही वादग्रस्त विधेयक संमत व्हायला नको. या उपायांतही अडचणी आहेत. कारण लोकसभेत विरोधी पक्षांची संख्या ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संख्येच्या निम्मीच आहे आणि विशिष्ट दिवशी सदस्यांचा सहभाग कमी झाल्यास अर्थपूर्ण चर्चा होणारच नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू