शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

देवभूमीत पावसाचे तांडव; तीन दिवसांमध्ये ७४ बळी, हिमाचलमध्ये १०,००० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:11 IST

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे.

शिमला :हिमाचल प्रदेशात आतापर्यंत सरासरीच्या दीडपट पाऊस झाला असून, मंडी, शिमला, हमीरपूर, कांगडा आणि बिलासपूर जिल्ह्यांत जास्त विध्वंस झाला आहे. या पावसामुळे सुमारे १०,००० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, तीन दिवसांत ७४ जणांचा मृत्यू झाला असून, २ हजारांहून जास्त जणांना वाचवण्यात आले. तर पावसाळा सुरू झाल्यापासून २१७ जणांनी प्राण गमाविले आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे ६,६०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. 

मंडी जिल्ह्यात सामान्यपेक्षा ३१७ टक्के, बिलासपूरमध्ये २२५ टक्के आणि शिमलामध्ये १९१ टक्के अधिक पाऊस झाला. ८००हून अधिक रस्ते, ११३५ विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि २८५ पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प झाल्या आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे १८०० हून अधिक मार्गावरील बससेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान राज्यात सामान्यत: ६४ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावेळी १३५.१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. (वृत्तसंस्था)

१४ मृतदेह सापडले; ७ अजूनही बेपत्ता

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे. येथे १४ ऑगस्ट रोजी शिवमंदिरावर दरड कोसळली होती. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले, तर ७ अजूनही बेपत्ता आहेत.

उत्तराखंडमध्ये शेकडो संसार उघड्यावर

उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे की, या हंगामात राज्याचे आतापर्यंत ६५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सततच्या भूस्खलनामुळे लोक घरसामान बांधून सुरक्षित ठिकाणी जायला निघाले आहेत.

महाराष्ट्रासह या राज्यांना अजून प्रतीक्षाच

पुढील दाेन दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाबच्या आठ जिल्ह्यांमध्ये पूर

अमृतसर : मुसळधार पावसामुळे पंजाबमधील आठ जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. भाक्रा धरणाचे दरवाजे उघडल्याने सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रोपर, होशियारपूर, गुरुदासपूर, कपूरथला, अमृतसर, तरनतारन आणि फिरोजपूरला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गुरुदासपूरच्या श्री हरगोबिंदपुरा येथे पावसाच्या नाल्याचे पाणी पाहण्यासाठी गेलेली दोन मुले वाहून गेली. होशियारपूरमधील अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.

 

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश